महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी महिला नेत्यांमुळे राज्यातले राजकारण तापले

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनी मोर्चा उघडला. महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या त्यांच्या कार्य पद्धतीवरून नाराजी वाढली असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांच्या मागणीवरून मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील दालनात महिला नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राजकीय पक्षांच्या महिला नेत्यांव्यतिरिक्त सामाजिक महिला कार्यकर्त्यांही उपस्थित होत्या. नीलम गोऱ्हे यांच्या व्यतिरिक्त महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजपा आमदार चित्रा वाघ, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि इतर राजकीय पक्षांच्या अनेक महिला नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

बैठकीत महिला आयोगाच्या सेवा प्रमाणन प्रक्रियेतील अडचणी, कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती आणि आयोगाकडून सरकार आणि समाजाच्या अपेक्षांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महिला आयोगाला सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळासह इतर संस्थांनीही महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. महिला आयोग अस्तित्वात आणण्याचे काम १९९३ पासून सुरू आहे. आयोगाचे काम जलदगतीने करण्यासाठी अधिक अधिकार, निधी आणि मनुष्यबळ देण्याची आवश्यकता आहे.

नीलम गोऱ्हे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्य महिला आयोग ही एकमेव सरकारी संस्था आहे जी महिलांच्या प्रश्नांचे सर्व पैलू उपस्थित करत राहते. त्यामुळे त्यांचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. सरकार आणि सामाजिक संघटनांनी ही प्रक्रिया वेगवान करावी. महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण आणि न्यायासाठी आयोगाकडून खूप अपेक्षा आहेत आणि सरकारनेही यासाठी पुढाकार घ्यावा.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी सीएसआर अंतर्गत निधीची परवानगी मिळवण्याचा मुद्दा उपस्थित केला. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या या आयोगाला सध्या खूप अपेक्षा आहेत आणि शक्ती कायदा, समान नागरी संहिता यासारखे धोरणात्मक आणि कायदेशीर बदल शिफारस करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तसेच आतापर्यंत महिला आयोगाच्या हेल्पलाइनवर ९९० हून अधिक कॉल आले आहेत आणि सादरीकरणातून असे दिसून आले की अनेक प्रकरणांचा विचार करण्यात आला आहे आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

महिला आयोगाचा विषय राज्यपालांपर्यंत पोहोचला

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांना रोखण्यात राज्य महिला आयोग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. विरोधी पक्षाच्या महिला नेत्यांनी असा आरोप केला की, महिला आयोगाचे आरोप, महिला आयोग विरोधी पक्षांच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी केली.

राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एसपी) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी आमदार विद्या चव्हाण, जयश्री शेळके आणि काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड उपस्थित होत्या.

राज्यपालांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. महिला आयोग हे थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे, त्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावरून काढून टाकण्याची मागणी अंधारे यांनी राज्यपालांकडे केली.

तसेच पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, राजकीय पक्षाच्या नेत्याऐवजी महिला आयोगाच्या पदावर आयएएस, आयपीएस अधिकारी किंवा न्यायाधीशाची नियुक्ती करावी. जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळू शकेल. अंरूपाली चाकणकर महिलांपेक्षा पक्षासाठी जास्त काम करत आहेत. सरकार पीडित महिलांना न्याय मिळत नसल्याने महिलांना न्याय मिळत नाही. त्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावरून काढून टाकावे आणि दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला आयोगाची जबाबदारी द्यावी अशी मागणीही यावेळी केली.

आयोगाला आणखी बळकटी देण्याची गरज आहे -चित्रा वाघ

दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या आमदार चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाल्या की, महिला आयोगाला आणखी बळकटी देण्याची गरज आहे. महिला आयोगात काही त्रुटी आहेत, त्यावर काम करावे लागेल. त्यामुळे येत्या काळात या संदर्भात अधिक बैठका घेतल्या जातील. काही विरोधकांनी आयोगाचे अध्यक्ष राजकीय नेते नसावेत अशी मागणी केली.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महिला आयोगाचे अध्यक्ष राजकीय नेते नसावेत असे जे म्हणत आहेत, त्यांच्या कार्यकाळातही राजकीय नेते अध्यक्ष होते. रूपाली चाकणकर यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकाळातही महिला आयोगाचे अध्यक्ष राजकीय व्यक्ती होते.

महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेलेल्या सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांच्यासह अनेक महिला नेत्यांना राजभवनात प्रवेश देण्यात आला नाही. राज्यपालांच्या वैयक्तिक सचिवांशी बोलल्यानंतर सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर आणि इतर महिलांना प्रवेश देण्यात आला, तर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांना प्रवेश देण्यात आला नाही, ज्यामुळे त्या खूप संतप्त झाल्या. जर इतर पक्षांच्या दोन नेत्यां जात असतील, तर काँग्रेसच्या दोन नेत्यांना जाण्यात काहीच अडचण नव्हती. असे मतही यावेळी व्यक्त केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *