मुंबई डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी मनोज भोयर यांची निवड डिजिटल क्रांतीचे नवे पर्व: मुंबई-ठाण्यातील पत्रकारांच्या बळाला मिळाली संघटनेची नवी धार

डिजिटल युगात वेगाने बदलत असलेल्या पत्रकारितेच्या प्रवासाला एक नवी दिशा आणि बळकटी मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुंबईत एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेली ८७ वर्षे पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या या मातृसंस्थेने आता डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून मुंबई आणि ठाणे विभागासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

मुंबई सीएसटी येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात डिजिटल पत्रकारांच्या संरक्षणासह त्यांच्या न्याय्य हक्कासाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि मुंबई अध्यक्ष राजा आदाटे यांच्यासह विभागीय सचिव दीपक कैतके व इतर मान्यवर उपस्थित होते.

या नियुक्ती सोहळ्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. मुंबई डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी मनोज भोयर यांची, तर ठाणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रभूषण विश्वकर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, विविध पदांवर अनुभवी पत्रकारांची वर्णी लावून संघटनेची ताकद वाढवण्यात आली आहे.

डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने पेलण्यासाठी आणि पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही नवी कार्यकारिणी सज्ज झाली आहे. मुंबईच्या मुख्य कार्यकारिणीतही राजकुमार आदाटे यांच्या नेतृत्वाखाली व विभागीय सचिव दीपक कैतके यांच्या सक्रिय सहभागातून विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून संघटनेचा विस्तार करण्यात आला आहे. दीपक पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पांडुरंग मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यामुळे डिजिटल क्षेत्रातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

About Editor

Check Also

पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई १ जून ते ३१ जुलै दरम्यान यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी

मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *