Editor

आठवलेंना त्यांच्याच कविता स्टाईलमधून गृहमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाढदिनाचे औचित्य

मुंबई : प्रतिनिधी आज नाताळचा दिवस असल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून देशमुखांनी आपल्या खुमासदार शैलीतून कविता रंगवली आहे. वाचू या त्यांच्याच भाषेतील कविता. बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडीबाहेर फिरू …

Read More »

शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी मित्र असल्याचे दाखवण्यासाठीची इव्हेंटजबाजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी इव्हेंटबाजी करत ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये दिल्याचा मोठ्या थाटात गवगवा केला. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची मागणी आहे परंतु त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी आपण …

Read More »

कोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ ३ हजार ४३१ नवे बाधित, १ हजार ४२७ बरे झाले तर ७१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज चांगलीच वाढ झाली असून कालच्या तुलनेत जरी ४०० ही संख्या कमी आहे. मात्र मागील २४ तासात बरे झालेल्या रूग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या जास्त असून ३ हजार ४३१ इतके रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधितांची संख्या १९ लाख १३ हजार ३८२ वर पोहचली आहे. …

Read More »

लोकसहभागासाठी मंत्री जयंत पाटलांचा आगळावेगळा इस्लामपूर पॅटर्न बुथ कमिट्यांच्या बैठकांसाठी घरोघरी पत्र पाठवून देतात आमंत्रण

सांगली : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांचा आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीसाठी नावलौकीक आहे. असाच एक नावलौकिक मिळवलेला त्यांचा आगळावेगळा ‘इस्लामपूर पॅटर्न’ आता नव्याने समोर आला आहे. लोकसहभागाचा दृष्टिकोन राखून इस्लामपूर मतदारसंघातील बुथ कमिट्यांच्या बैठकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयातून घरोघरी आमंत्रण पत्र पाठवले जात आहे. आपला …

Read More »

या ९६ पोलिस निरिक्षकांना मिळाल्या तात्पुरत्या पदोन्नत्या गृहविभागाकडून पदोन्नतीचे आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून रखडलेल्या ९६ पोलिस निरिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीचे आदेश आज गृहविभागाने जारी केले. या ९६ अधिकाऱ्यांमध्ये २०१७-१८ आणि २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षातील निवड सूचीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील पोलिस निरिक्षकांना उप अधिक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व …

Read More »

गृह राज्यमंत्री आणि नोडल अधिकाऱ्याच्या आदेशानंतर अखेर अॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल कॉ.सुबोध मोरे, शैलेंद्र कांबळे यांच्या प्रयत्नाला यश

मुंबई : प्रतिनिधी मागासवर्गीय आकाश जाधव या २२ वर्षाच्या दलित तरुणाला हनुमान टेकडी, सांताक्रूझ पूर्व येथे जातियवादी गुंडानी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा ४डिसेंबर २० रोजी कुपर रुग्णालयात अकाली मृत्यू झाल्यानंतर सदर जातीयवादी गुंडवक अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिडीत कुटुंबियांबरोबर, सामाजिक कार्यकर्त्ये कॉ.सुबोध मोरे आणि शैलेद्र कांबळे …

Read More »

कोरोना: मुंबईतील मृतकांचा आकडा ११ हजार तर राज्यात ४९ हजारपार ३ हजार ५८० नवे बाधित, ३ हजार १७१ बरे झाले तर ८९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या काळात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या १० हजारावर पोहोचली होती. मात्र मृतक आणि बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानाला चांगलेच यश मिळाले असून मागील तीन ते चार महिन्यात मुंबईतील मृतकांच्या संख्येत १ हजाराने वाढ झाल्याने मुंबईतील मृतकांची …

Read More »

कंगनाच्या घराचे भवितव्य दिंडोशी न्यायालयाच्या हाती उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दिंडोशी न्यायालयाने काल मुंबई महापालिकेने बजाविलेली नोटीस योग्य असल्याचा निकाल दिला. त्याविरोधात महापालिकेने बजाविलेली ही नोटीस रद्दबातल करावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने दिंडोशी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित असल्याने राणावत हीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे …

Read More »

शिवसेनेचे मंत्री शिंदे म्हणाले, पवारांनी पुढाकार घेतला तर मार्ग निघेल कांजूर मार्ग कारशेडप्रकरणी मंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मुंबई : विशेष प्रतिनिधी मुंबई शहरासाठी सार्वजनिक वाहतूकीच्या दृष्टीकोनातून नियोजित मेट्रो ३.४.६ प्रकल्पाकरीता नुकतीच राज्य सरकारने कांजूर मार्ग येथील जागेची निवड केली. मात्र या जमिनीवरून  केंद्र सरकार न्यायालयात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले. अशा प्रसंगी राज्यातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मार्गदर्शन करत असतात. मात्र याप्रश्नी …

Read More »

मराठा समाजातील उमेदवारांसाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाण पत्र देणार

मुंबई: प्रतिनिधी एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल, उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा …

Read More »