Editor

कोरोना: सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण पुण्यात तर सर्वात कमी हिंगोलीत ३ हजार ५३७ नवे बाधित, ४ हजार ९१३ बरे झाले तर ७० मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील १० दिवसाहून अधिक काळ ४ हजार ५०० कमी कोरोना बाधित राज्यात आढळून येत आहेत. तसेच बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढतच असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्याही घटताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण १३ हजार ७४३ पुणे शहर व जिल्ह्यात आहेत. तर सर्वात कमी हिंगोली …

Read More »

करचोरी करत असाल तर खबरदार ! GST विभागाकडून कारवाईला सुरुवात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाकडून दिनेश कनोडियास अटक

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून केलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले की, योगेश जगदीशप्रसाद कनोडिया या व्यक्तीने मे.यश फैब्रिक्स, मे. श्री.गणेश टेक्सटाईल, मे.जे.के फॅब्रिक्स व मे.क्रिष्णांश इंटरप्रायजेस, या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत. मात्र नोंदणी करताना या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोंदणी क्रमांक …

Read More »

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी राज्य सरकार करणार शिफारस सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज  सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. …

Read More »

कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे, त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळी चौकशी केली नाही. तर काहींच्या घरी औषधं सापडली त्यांचीही चौकशी केली. …

Read More »

सीबीआय काही करू शकत नसल्याने ईडीचा वापर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भाजपावर टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने  सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नसल्याची टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. …

Read More »

इमारती, गृहनिर्माण संस्थाना जमिनीची मालकी प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम १ ते १५ जानेवारी दरम्यान डीम्ड कन्व्हेअन्स विशेष मोहिम- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थासाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. या …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरातील ९ महानगरपालिकांसह ३० जिल्हे मृत्यू मुक्त ३ हजार १८ नवे बाधित, ५ हजार ५७२ बरे झाले तर ६८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील ५ महानगरपालिकांच्या हद्दीत काल मृतकांची नोंद झाल्यानंतर आज त्यात वाढ झाली असून तब्बल ९ महापालिकांच्या हद्दीत शून्य मृत्यूची माहिती पुढे आली आहे. तर राज्यातील २१ शहर व जिल्ह्यांमध्येही शुन्य मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून राजधानी असलेल्या मुंबईत मात्र ६ मृतकांची नोंद झाली आहे. राज्यातील …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा २९ व ३० डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे समित्यांना निर्देश

पुणे: प्रतिनिधी ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन …

Read More »

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा मोदी सरकारला अल्टीमेटम ३० डिसेंबरच्या बैठकीत तोडगा काढा अन्यथा विरोधी पक्ष पाठिंबा देतील

नवी दिल्लीः प्रतिनिधी मागील ३४ दिवसापासून नव्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारबरोबर उद्या ३० डिसेंबर रोजी चर्चेची ७ वी फेरी होत आहे. या चर्चे दरम्यानच केंद्राने अंतिम तोडगा काढावा अन्यथा देशातील सर्व विरोधी पक्ष या आंदोलनास पाठिंबा देतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …

Read More »

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांचे घुमजाव म्हणे प्रसारमाध्यात आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही

मुंबईः प्रतिनिधी आगामी मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस एकट्याने लढविणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेसच्या स्थापना दिन आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोक भाई जगताप यांच्या पदग्रहणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली होती. मात्र त्याबाबत आज पुर्णतः घुमजाव करत प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तावर आपण भाष्य करत नसल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. …

Read More »