Editor

मुख्यमंत्र्यांचे आदेश, पिक कर्ज मिळत नाही ही तक्रार आली नाही पाहिजे राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा

मुंबई : प्रतिनिधी खरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

कोरोना: राज्यातील २५५३ संख्येसह मुंबई पोहोचली ५० हजारावर : रिकव्हरी रेट वाढला राज्यात १०९ जणांचा मृत्यू तर मुंबई-ठाण्यात आतापर्यंत २१३४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात २५५३ नव्या कोरोनाग्रस्तांची आणि १०९ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. राज्यातील एकूण बाधीतांची संख्या ८८ हजार ५२८ वर पोहोचली असून यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ३७४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील एकूण रूग्णसंख्येपैकी ५० हजार ८५ तर मुंबई महानगरात २१३४ जणांचा आतापर्यत मृत्यू झाल्याची …

Read More »

केंद्रीय मंत्री आठवलेंनी लाईक केले या मोदी विरोधी ट्विटला ऊर्जा मंत्री राऊत यांचे ट्विट

मुंबई: प्रतिनिधी राज्य असो किंवा केंद्र असो बदलत्या राजकारणाचे वारे ओळखणारे राजकारणी जे काही आहेत. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे फार वरचे स्थान आहे. या बदलत्या राजकारणाचा अंदाज घेवून राजकिय आघाड्या करण्यातही त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न, कोरोनाची वाढती संख्या आणि आर्थिक …

Read More »

गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस किवळे फाटा येथे वाढदिवस केला साजरा

मुंबई: प्रतिनिधी गृहमंत्री अनिल देशमुख काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याची माहिती घेतली. तसेच अडीअडचणी बाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले …

Read More »

महिला, मधुमेह, हार्टचे पेशंट, श्वसन विकारग्रस्तांना शासकिय कार्यालयात बोलावू नका सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व प्रशासनाला आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी मधुमेह, हार्टचे पेशंट आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये बोलाविण्याऐवजी त्यांना घरूनच काम करण्याचे आदेश द्यावेत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या प्रशासनाला दिली. याबरोबरच महिला या कुटुंबातील प्रमुख असतात त्यामुळे या महिलांनाही कार्यालयात …

Read More »

शरद पवार दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील 'निसर्गा' चा तडाखा बसलेल्या गावांची करणार पाहणी

मुंबई: प्रतिनिधी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. ९ जून …

Read More »

चक्रीवादळ बाधितांना मोफत केरोसीनचे वाटप करणार अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे या भागातील वीज खंडीत झाल्याने बाधीत कुटुंबियांना केरोसीन राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्या जिल्ह्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व …

Read More »

कोरोना: सर्वाधिक रूग्णांची नोंद होत एकूण संख्या ४३ हजारावर ९१ जणांचा मृत्यू , १९२४ जण बरे होवून घरी गेले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आतापर्यत कोरोनाग्रस्त रूग्ण संख्या अर्थात ३ हजार ७ रूग्णाची नोंद झाली असून मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ८५ हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे. तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ४३ हजार ५९१ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर २४ तासात १९२४ …

Read More »

हज यात्रा रद्द करायचीय? तर या ई-मेलवर फॉर्म भरा हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता ज्या यात्रेकरुंना आपली यात्रा रद्द करावयाची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीला ईमेलद्वारे कळवावे. या यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय परत दिली जाईल, असे केंद्रीय हज समितीने कळविले आहे. जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ मार्च २०२० रोजी सौदी …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात ८० रूग्ण ११ तालुक्यात ६ तर शहरातील मृतकांची संख्या १०१ वर

सोलापूर : प्रतिनिधी शहरातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्यात वाढत असताना या आजाराचे लोण आता ग्रामीण भागातही हळूहळू पसरत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ८० रूग्ण आढळून आले आहे. तर यापैकी ६ जणांचा मृत्यू तर ६ जण बरे झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६० …

Read More »