मुंबई: प्रतिनिधी कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रूग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख त्यांनी मांडला आहे. दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर आणि तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यानंतर तेथे …
Read More »२२ जुलैला शिक्षक भारती करणार राज्यव्यापी पोस्टर आंदोलन शिक्षक संघटनेचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारती बुधवारी २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करणार आहे. जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकारी अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक …
Read More »२००० सालचे धोरण बदलले तरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा सहकारीऐवजी शासकिय दूध विक्रीला प्राधान्य देणे गरजेचे
मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील काही वर्षापासून दूध उत्पादक शेतकऱ्याना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांला प्रति लिटर मागे ५ रूपये, १० रूपये अनुदान द्यावी अशी मागणी विविध शेतकऱ्यांच्या संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र वास्तविक पाहता राज्य सरकारने २००० साली काढलेले दूधविषयक धोरणात जर बदल केला तर …
Read More »दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार दूग्धविकास मंत्री सुनिल केदार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. या बैठकीस …
Read More »शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवायचीय महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी -मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसित करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील कृषीविद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित …
Read More »म्हाडाचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी होणार गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्रात म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी गृहनिर्माण विभागातील उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच २ महिन्यात या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यास आदेश दिले आहेत. साधारणत: २० ते २५ वर्षापूर्वी अर्थात १९९३ साली राज्यात शिवसेना-भाजपा …
Read More »कोरोना: मृतकांची संख्या १२ हजारावर; २० दिवसात ८४ हजार बरे राज्यात ५४६० जण घरी तर नवे बाधित ८२४०
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ …
Read More »सावधान ! मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावरून फसवणूकीची शक्यता सावधगिरी बाळगण्याचे सायबर विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर सायबर भामट्यांकडून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यापासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलं /मुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडीसाठी अनेक मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर नोंदणी करतात, तसेच विवाह जमविणाऱ्या बऱ्याच संस्थांनीही स्वतःचे संकेतस्थळ सुरु केले आहे. यावर उपवर मुले-मुलींच्या पालकांना …
Read More »‘डिजीटल स्त्री शक्ती’ : ५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’ राज्य महिला आयोगाचा उपक्रम- ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार शुभारंभ
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या २१ जुलै रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील १० शहरातील ५०००महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. …
Read More »नव्या १२ हजार ५३८ पोलिस भरतीसह २०१९ च्या अर्जदारांचीही भरती होणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरती साठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या असून डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव …
Read More »
Marathi e-Batmya