श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलविण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. …
Read More »सचिन सावंत यांची माहिती, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय, तरुणाईचा विजय नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमा
देशातील कोट्यवधी तरुणांच्या आशा-आकांशा व स्वप्नाशी खेळणाऱ्या मोदी सरकारला तरुणाईने झुकवले आहे. नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. प्रधान सेवकापासून सुरु झालेला आणि नॉन बायालॉजिकल पर्यंत आलेला हा प्रवास …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार
नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा लढा संपलेला नाही, मोदी सरकारच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधातील काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांना व या रॅकेट मधील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे, …
Read More »राहुल गांधी यांचा इशारा, तर अशा प्रकारच्या गोष्टी दहापट मोठ्या घडू शकतात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला इशारा
राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा विजय असल्याचे म्हटले, परंतु सरकारला इशारा दिला की हे आंदोलन एका मोठ्या संकटाची केवळ सुरुवात आहे. जर सरकारने लोकांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले, तर अशाच प्रकारच्या घडामोडी ‘दहापट मोठ्या’ प्रमाणात घडू शकतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी …
Read More »राहुल गांधी यांचा इशारा, या सरकारला हटविण्याची वेळ आलीय धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा हा शिक्षण व्यवस्थेच्या पुर्नबांधणीच्या दिशेने मोठे पाऊल
नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील तरूणांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत होते. अखेर आंदोलकांच्या दबावापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर विरोधी …
Read More »धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकारच्या आश्वासनाने कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे प्रलंबित मागण्यांवर अंलबजावणी करण्यास दाखविली सरकारची तयारी, पत्रकार परिषदेत दिली माहिती
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि आंदोलक व आयोजकांवरील एफआयआर मागे घेण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीच्या जंतर मंतरवरील आपले ४९ दिवसांचे आंदोलन अधिकृतपणे मागे घेतले आहे. सीजेपीचे प्रतिनिधी मंडळ आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा व जितेंद्र सिंह यांच्यासह सरकारच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा …
Read More »कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, “सुबह हो गयी मामू” राजीनाम्याच्या वृत्तानंतर अभिजीत दीपके म्हणाले की, येस वी हॅव डन इट
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर काही क्षणांतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी शनिवारी ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ मधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरत, “सुबह हो गई मामू.” अशी पहिली प्रतिक्रिया दिल्लीच्या जंतर मंतर येथील मंचावरून दिली. त्यांच्या या वक्तव्याचे …
Read More »अखेर केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाः कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश राष्ट्रविरोधी शक्तींना रोखणे या उद्देशाने निर्णय घेतल्याचे सांगितले
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या तरुणांच्या मोठ्या आंदोलनाचा गैरफायदा घेण्यापासून “राष्ट्रविरोधी शक्तींना” रोखणे, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. मोदी सरकारमधील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने सततची रस्त्यावरील आंदोलने …
Read More »बाबासाहेब पाटील यांची माहिती, शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रामाणित करण्याचे आवाहन
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पुढे बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, या योजनेअंतर्गत राज्यातील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टोक्ती, संकटातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी …
Read More »
Marathi e-Batmya