Editor

डॉ एस जयशंकर यांचा खुलासा, मानवतेचा विचाराने इराणी युद्धनौकेला कोचीत जागा भारतीय हद्दीत इराणी युद्धनौका अमेरिकेच्या पाणीबुडीकडून जलसमाधी दिल्यानंतर स्पष्टीकरण

अमेरिका आणि इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारताने भू-राजकीय घटकांचा विचार न करता “मानवतेचा” विचार करून इराणी नौदलाच्या जहाजाला कोची येथे बंदरात उतरण्याची परवानगी दिली, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. रायसीना संवादात बोलताना जयशंकर यांनी असेही म्हटले की, हिंद महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने दुसरे इराणी जहाज, आयआरआयएस देना बुडवणे …

Read More »

इराणच्या राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील राष्ट्रांची माफी मागत केली ही घोषणा जोपर्यंत दुसऱ्या राष्ट्रातून हल्ला होत नाही तोपर्यंत हल्ला न करण्याचे धोरण

इस्त्रायल आणि अमेरिकी सैनिकांनी इराणवर हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह तेथील लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा केला. तसेच इराणच्या अण्वस्त्र स्थळांवरही हल्ले करत मोठ्या प्रमाणावर इराणचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रातील अमेरिकी सैन्य स्थळांवर इराणने हल्ले करत अमेरिका प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न केला. तसेच …

Read More »

शेतकरीविरोधी भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची ९ मार्चला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी व कृषी क्षेत्र देशोधडीला लागणार आहे. आधीच अस्मानी सुलतानी संकटात पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी व्यापारी करार हा मोठा आघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर सपशेल शरणांगती पत्करली असून या करारामुळे भारतातील शेतमालाला भाव मिळणार नाही परिणामी शेतकरी आत्महत्यांचे …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य विषयी हक्कांना बळ देत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांची टीका, इराण आता मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र इराणच्या अध्यक्षांनी शेजारील राष्ट्रांची माफी मागितल्यानंतर ट्रम्प यांचे वक्तव्य

चालू युद्धात अविरत हल्ल्यांसाठी इराणने आपल्या आखाती शेजाऱ्यांकडून माफी मागितल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच त्याचा फायदा घेतला. ट्रुथ सोशलवरील एका निवेदनात, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराण आता “मध्य पूर्वेचा गुंड” राहिला नाही तर तो पराभूत झाला आहे. रिपब्लिकनने असा दावा केला की इराणची माफी केवळ चालू युद्धात अमेरिका …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, भारत अमेरिकेचे ५१ वे राज्य आहे का? तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर हल्लाबोल !

अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास ३० दिवसांची “परवानगी” दिल्याच्या वृत्तानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली. भारताच्या व्यापार आणि परराष्ट्र आर्थिक धोरणांवर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना म्हणाले की, आपले आर्थिक व्यवहार …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, कर्ज काढून फटाके वाजविणारा अर्थसंकल्प कामगारांसाठी फसवा, विकासाचं मृगजळ दाखवणारा हा अर्थसंकल्प

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. यासोबतच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसंदर्भात इतरही काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा, वाटचाल दिवाळखोरीकडे तिसरी व चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग अदानी अंबानीच्या फायद्यासाठी, सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात स्थान नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका

राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही केली जाईल. शासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर वाहतूकदार संघटनांनी संप मागे घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील वाहतूकदार संघटनांनी ५ मार्च २०२२ पासून …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, अग्निवीरांच्या पुनर्वसनाबाबत शासनाकडे समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय अग्निवारांच्या पुर्नवसनाबाबत धोरणच तयार नाही

अग्निवीर योजनेतंर्गत सेवा पूर्ण करून परतणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल ७ एप्रिलपूर्वी शासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य चंद्रदीप नरके यांनी अग्निवीर जवानांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई …

Read More »