Breaking News

कोरोना: अबब..१६ जून पर्यंत राज्यात ५ हजार ५०० हून अधिक मृत्यू अॅक्टीव्ह रूग्ण ५० हजारावर तर बरे होवून घरी गेले ५७ हजार

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य सरकार मृतकांचा किंवा रूग्णाच्या आकडेवारी लपवित असल्याची चर्चा दबक्या आवाजात सरकार दरबारी सुरु होती. त्याची परिणती अखेर याविषयीची माहिती प्रसारमाध्यमात आणि विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आतापर्यतची आणि फेरतपासणीत आढळून आलेल्या आकडेवारीनुसार ९ मार्च पासून ते १६ जून पर्यत ५ हजार ५३७ जणांचा मृत्यू …

Read More »

सरकारची अखेर कबुली : फेरतपासणीत मुंबईत ८६२ तर राज्यात ४६६ मृत्यू सापडले मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधीतांचे मृत्यूची आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसारमाध्यमातूनही ही माहिती उघडकीस आली. त्यावर अखेर राज्य सरकारने यावर खुलासा देत मुंबईत ८६२ तर राज्यात ४६६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी राहीली असल्याचे सांगत ही आकडेवारी फेरतपासणीत पुढे आल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता …

Read More »

एसटी प्रवाशांना खुषखबर, पासला मुदतवाढ किंवा परतावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पास साठी, मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना या मासिक/ …

Read More »

दोन-अडीच महिन्याचे वीजबिल एकत्रित आल्यास घाबरू नका मात्र बील भरा पूर्वी भरलेल्या रकमेची कपात; नियमानुसार स्लॅब बेनेफिट; वीज वापरानुसार अचूक बिल

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारा स्लॅब बेनेफिटही देण्यात आला …

Read More »

ICMR चा सिरो सर्व्हे म्हणतो, महाराष्ट्रात कोरोनाचा अत्यल्प संसर्ग सहा जिल्ह्यात १.१३ टक्के रूग्णांचे प्रमाण

मुंबई : प्रतिनिधी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आय सी एम आर ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी दिनू रणदिवे या व्यक्तींनी व्यक्त केला शोक

पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्यावर आघातच झाला होता. प्रत्येक लढ्यात त्यांची साथ असायची.संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला …

Read More »

पत्रकारतेतील दिनू रणदिवे नामक धडाडीचा आवाज बंद झाला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील नामवंत आणि आदराने नाव घेणाऱ्यांच्या पत्रकारांच्या यादीतील ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. पत्रकारातेतील निवृत्तीनंतरही अनेक अन्यायकारक घटनांना आपल्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारी वृत्तीने आवाज फोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी नेहमीच दलित, वंचित, उपेक्षितांच्या आवाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

कोरोना: आतापर्यतची सर्वाधिक मृतकांच्या संख्येची नोंद २ हजार ७८६ नव्या रूग्णांची नोंद तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या बरे होवून गेलेल्या रूग्ण संख्येपेक्षा जास्त असायची. मात्र आज विक्रमी ५ हजार रूग्णांना घरी पाठविण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५६ हजारावर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर आली आहे. मात्र आज पर्यंतच्या सर्वाधिक संख्यांना मागे टाकत मृतकांची तब्बल १७८ वर …

Read More »

चीनसह १२ देशांची राज्यात १६ हजार कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री देसाईंच्या उपस्थिती करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई: प्रतिनिधी एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करुत. हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र …

Read More »

राज्यपाल कोश्यारींनी मिळविला प्रथम क्रमांक आणि २५ हजाराचे बक्षिस डाक विभागाच्यावतीने राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा गांधीवरील पत्रलेखन स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक पी सी जगताप व सहाय्यक अधिक्षक एस डी खरात …

Read More »