Breaking News

१५ हजार ‌शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

अहमदनगरः प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे भाजप – शिवसेना सरकारचे अपयश आहे. मात्र राज्यातील सगळ्या जनतेने गुण्यागोविंदाने नांदावे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे राष्ट्रवादीचे लक्ष असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. आज बेकारीने तोंड वर काढले …

Read More »

पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांना १० लाखाची मदत द्या तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मराठवाडा व विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. या महापुरामुळे शेतमालासह खाजगी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी तसेच पूरग्रस्त …

Read More »

पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल

पुणे – राजगुरुनगर – खेडः प्रतिनिधी आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला केला. शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर – खेड येथे पार पडली. …

Read More »

पुरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी १६२ वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पुर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे १४ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती आरोग्य …

Read More »

नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथके तैनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

यवतमाळः प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून या उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथकांना तैनात करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश आपण प्रशासनाला दिल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

जम्मू आणि काश्मीरचा स्वायततेचा दर्जा व वास्तव ३७० कलमाच्या माध्यमातून भाजपाचा जम्मू आणि काश्मीर राज्याकडे पाह्यण्याचा दृष्टीकोन

जम्मू आणि काश्मीर राज्याविषयीची चर्चा नेहमीच संपूर्ण देशभरात कधी जिहादी कारवायांमुळे, कधी दहशतवाद्यांनी लष्करी, निमलष्करी दलांवर केलेल्या हल्ल्यामुळे, तर कधी स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे होत असते. याशिवाय जम्मू आणि काश्मीर राज्याचा मुद्दा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीयस्तरावर उपस्थित केल्यानंतर. ७०-८० च्या दशकात जम्मू आणि काश्मीरला भारताचा मुकूट (काटेरी) आणि दुसरे स्विझरलँड …

Read More »

छत्रपतींचा आशीर्वाद घेवून राष्ट्रवादीच्या ‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’ सुरु खा. डॉ.अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले पूजन

जुन्नरः प्रतिनिधी नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशिर्वाद घेवून आज करण्यात आली. ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी कौतुक करूनही शेतकऱ्याने केली आत्महत्या अकोल्यातील घटनेवरून अशोक चव्हाण यांची भाजप सरकारवर टीका

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर राज्यातील फडणवीस सरकारच्या अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ यावी, हा प्रकार भाजप सरकारसाठी लज्जास्पद असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता चव्हाट्यावर आल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय महामार्गात …

Read More »

राज्यात भयंकरस्थिती तर मुख्यमंत्री मत मागतायत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी गेल्या पाच सहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावेच्या गावे, घरे, संसार, शाळा, कॉलेजेस, रस्ते सर्वच उध्वस्त झालेले आहे. सगळीकडे पाणीच पाणी साचल्याने महाराष्ट्रातील जनता भयभीत झालेली आहे. महाभयंकर परिस्थिती ओढवली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल, संपूर्ण कोकण, नाशिक, …

Read More »

आदिवासी विभागातील साहित्य खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा उच्चस्तरीय चौकशी करून घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्य खरेदीत घोटाळा करुन राज्याची जवळपास ६० ते ७० कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. राज्यातील ५०२ आश्रमशाळामधील २ लाख विद्यार्थी तसेच वसतीगृहातील ५८ …

Read More »