Breaking News

जगावं की मरावं ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा पावसामुळे शेतकरी हवालदिल

नाशिकः प्रतिनिधी आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना शेतकऱ्यांनी कथन केली. परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना राष्ट्रवादी …

Read More »

बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली. आर्थिक …

Read More »

विजय सिंगच्या मृत्यूची मानवाधिकार आयोगामार्फत चौकशी करा आयोगात राष्ट्रवादी खटला लढविणार असल्याची प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी वडाळा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन केली. विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि पोलिस …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले भाजपाचा प्रस्ताव आलाच नाही शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून ६ दिवस झाले तरी महायुतीतील सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला घोळ काही केल्या संपेना. त्यातच आता भाजपाने १३ मंत्रीपदासह उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव शिवसेनेला पाठविल्याची माहिती भाजपा सूत्रांनी दिली. परंतु अशा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव शिवसेनेकडे आला नसल्याची स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने …

Read More »

आणि तेल लावलेल्या पैलवानाने अब की बार २२० पारचा वारू अडविला शरद पवारांच्या झंझावातामुळे मरगळलेल्या काँग्रेसला ४३ हून अधिक जागा तर राष्ट्रवादीला ५० हून अधिक

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही वर्षापूर्वी शरद पवार हे तेल लावलेले पैलवान असून ते कशातच सापडत नसल्याचे प्रशस्तीपत्रक शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. तर त्याच अनुषंगाने विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी समोर विरोधक रूपी पैलवान दिसल्याचे वक्तव्य करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नसल्याचे दाखवून दिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

युती सरकारला मदत करण्यासाठी १५ बंडखोर संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या निकालावर आता काही बोलणार नाही. त्याचे विश्लेषण नंतर करणार आहे. मात्र राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ भाजपा-शिवसेनेला मिळाले आहे. तरीही आमच्याविरोधात बंडखोरी करून विजय मिळविलेल्या १५ बंडखोर विजयी उमेदवारांकडून सरकार स्थापनेसाठी मदत करणार असून ते संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निकालानंतर संध्याकाळी भाजपा …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणतात, भाजपाबरोबर फॉर्म्युल्यानुसार पुढे जाणार आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या निकालाने राज्यातील सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घेण्याशिवाय भाजपाला पर्याय राहीला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने ठाकरे घराण्याचा वारस असलेल्या आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात कोणीही सत्तेवर आले तरी …

Read More »

भाजपा-सेनेचे मंत्री पराभूत मुंडे, भेगडे, शिवतारे, शिंदे, खोतकर,बोंडे, फुके यांचा पराभव

मुंबईः प्रतिनिधी अब की बार २२० पारचा नारा देत भाजपा-शिवसेनेने निवडणूकीची घोषणा होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश, जनआर्शीवाद यात्रा काढल्या. मात्र या यांत्रांचा परिणाम काही राज्यातील जनतेवर झालेला नसून यात भाजपा-शिवसेनेचे ५ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे. राज्य …

Read More »

उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ४ लाख ८३ हजार मतांनी विजयी

मुंबईः प्रतिनिधी सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ …

Read More »

भाजपा-सेनेच्या सत्ता उन्मादाला जनतेने नाकारले विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. विधानसभा निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »