आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात असलेल्या पेडापरुपुडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्ये प्रिय व्यक्ती चेरुकुरी रामोजी राव जे एक व्यावसायिक उद्योगपती, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक, ईनाडू समूह आणि इतर अनेक उद्योगांचे संस्थापक यांचे मुख्य प्रवर्तक यांचे आज निधन झाले. तसी रामोजी राव यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
खेड्यात एका विनम्र शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि वाढलेले रामोजी राव उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आणि समाज, मीडिया, संस्कृती यातील त्यांच्या ८७ वर्षांच्या प्रवासात त्यांच्या समर्पण, बांधिलकी, जबाबदारी आणि शिस्त यामुळे कृषी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये एका कर्तबगार पदावर पोहोचले. सी रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी झाला आणि त्यांच्या वडीलांचे नाव वेंकट सुब्बा राव आणि आईचे नाव वेंकट सुब्बाम्मा असे होते. सी रामोजी राव यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांना शोक अनावर झाला.
रामोजी राव यांचे काल रात्री ७ जूनला मध्यरात्री झोपेतच निधन झाले. मात्र सर्वसामान्य शेतकऱी कटुंबात जन्माला येऊनही हॉस्पीटॅलिटी, प्रसारमाध्यमे (यात वर्तमान पत्र-टिव्ही चॅनल्स) खाद्य पदार्थ चीटफंड योजना, तेलगू फिल्म इंडस्ट्रीत त्यांनी मोठे योगदान दिले.
पेडापरुपुडीचे माजी सरपंच आणि रामोजी फाऊंडेशनचे सदस्य गारपती बाबुराव यांनी सांगितले की, रामोजी राव यांनी त्यांचे गाव दत्तक घेतले आणि फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे २० कोटी रुपये खर्च केले आणि २० कोटी रुपये खर्चाची अंदाजित इतर कामे गावात लोक कल्याण आणि विकासासाठी विचाराधीन आहेत.
बाबुराव म्हणाले, रामोजीरावांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेची पुनर्बांधणी केली. प्राथमिक शाळेव्यतिरिक्त, त्यांच्या गावातील योगदानामध्ये डिजिटल क्लासरूम सुविधा असलेली एमपीपी शाळेची इमारत, एक पशुवैद्यकीय रुग्णालय, पाण्याची ओव्हरहेड टाकी, गरीब लोकांच्या ७०० हून अधिक घरांना मोफत पाण्याचे नळ कनेक्शन, सहकारी बँकेची इमारत, कुंपण घालून पाण्याच्या तलावाचे सुशोभीकरण, तलावाभोवती चालणारा ट्रॅक आणि इतर अनेक कामे केल्याचे सांगितले.
माजी सरपंच पुढे म्हणाले की रामोजी राव यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी अनेक प्रकल्प मंजूर केले, ज्यासाठी सुमारे ₹२० कोटी खर्च येईल. भूमिगत गटार बांधण्यासाठी त्यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, रामोजी राव यांनी दीड एकर जमीन खरेदी केली जिथे गावकऱ्यांसाठी कंपाउंड वॉल बांधण्यात आली.
बाबुराव पुढे म्हणाले की, गावातील आपली सर्व मालमत्ता विकणाऱ्या रामोजी राव यांनी रहिवाशांना दान करण्यासाठी पुन्हा जमीन खरेदी केली. ते म्हणाले की, या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्य पातळीवरील सरकार बदलल्यानंतर गावातील जलद विकास आणि वाढीची अपेक्षा सर्व गावकऱ्यांना होती, परंतु रामोजी राव यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या आशा संपुष्टात आल्या.
गावातील रामोजी फाऊंडेशनचे आणखी एक सदस्य पी. प्रसाद, छप्पीडी किशोर आणि इतर ग्रामस्थांनी सांगितले की, रामोजी राव यांच्यामुळे गावाला खूप फायदा झाला. गाव दत्तक घेण्यापूर्वी रामोजी राव यांनी सर्व रहिवाशांना हैद्राबाद रामोजी फिल्मसिटीमध्ये बोलावले आणि त्यांच्यासोबत संपूर्ण दिवस घालवला आणि गावाच्या गरजांवर चर्चा केली. रामोजी राव यांनी गरिबांसाठी शौचालये बांधली आणि गावात पथदिवे बदलण्यास मदत केली.
गावात जमलेल्या रहिवाशांनी रामोजी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. रामोजी राव हे त्यांच्यासाठी कायमचे प्रेरणास्थान होते आणि ते एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही व्यवसाय उद्योगात पराक्रमी म्हणून कसे विकसित झाले ते आठवते अशी आठवणही सांगितले.
Marathi e-Batmya