अर्थविषयक

राज्यातील पाच लाख युवक-युवतींच्या सुक्ष्म व लघु उद्योगासाठी अर्थसंकल्पात तरतूद 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती' कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय माझा हक्क' उपक्रमांचा शुभारंभ

बारामती : प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

उद्योगांचे वीज दर कमी होणार ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. उद्योगांना वीज दरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्रि अतिथीगृह …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या या जवळच्या उद्योगपती आणि त्याच्या कंपन्यांना सेबीने केला दंड रिलायन्स आणि मुकेश अंबानीवर पेट्रोल घोटाळ्याप्रकरणी कारवाई

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उद्योजकांच्या यादीत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह अन्य दोन कंपन्यांना आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना भांडवली बाजार नियामक अर्थात ‘सेबी’ने एकूण ७० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये (आरपीएल) आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली. सेबीने …

Read More »

मुद्रांक शुल्क कपातीमुळे राज्याच्या तिजोरीत कोट्यावधी रूपयांची भर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही …

Read More »

करचोरी करत असाल तर खबरदार ! GST विभागाकडून कारवाईला सुरुवात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाकडून दिनेश कनोडियास अटक

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून केलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले की, योगेश जगदीशप्रसाद कनोडिया या व्यक्तीने मे.यश फैब्रिक्स, मे. श्री.गणेश टेक्सटाईल, मे.जे.के फॅब्रिक्स व मे.क्रिष्णांश इंटरप्रायजेस, या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत. मात्र नोंदणी करताना या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोंदणी क्रमांक …

Read More »

होतकरु तरुणांच्या स्टार्टअप्सच्या पेटंटसाठी १० लाखापर्यंतचे अर्थसहाय्य देणार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. तरुणांनी त्यांचे कौशल्य, गुणवत्ता आणि नवनवीन संकल्पना वापरुन विकसित केलेल्या स्टार्टअप्सना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी मोठा खर्च होतो. बरेच होतकरु …

Read More »

कोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची माहिती

नवी दिल्लीः प्रतिनिधी कोरोनामुळे गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २.६५ कोटी रूपयांच्या तिसऱ्या पॅकेजची घोषणा केली असून केंद्राने यावेळी आत्मनिर्भर भारत ३.० चीदेखील घोषणा करत या अंतर्गत अर्थमंत्र्यांनी १२ घोषणा केल्या. दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी करोनाचा धोका मात्र अद्याप कमी झालेला …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट सिंगापूर, जपानसह देशातील उद्योगपतींबरोबर ३५ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यात एक विश्वास आहे. त्यामुळे मागील सांमजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात १ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मँग्नेटीक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्यात सिंगापूर, जपान यांच्यासह देशातील विविध उद्योगपतींसोबत ३५ …

Read More »

रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ ९ तारखेपासून वाढीव वेळेत सुरु राहणार

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने गेली काही महिने आर्थिक बाजारातील व्यापारावर वेळेचे निर्बंध आणण्यात आले. परंतु आता लॉकडॉऊनमध्ये शिथिलता आणत सर्वच गोष्टी पूर्वपदावर आणण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर आर्थिक बाजारातील व्यापारावर असलेली वेळेची मर्यादेत पुन्हा वाढ कऱण्याचा निर्णय घेण्यात आला असून या वाढीव वेळेची अंमलबजावणी ९ नोव्हेंबर …

Read More »

लॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय ? जाणून घ्या केंद्रिय वित्त विभागाने बँकाना हे आदेश

मुंबई: प्रतिनिधी विविध बँकांकडून देशातील सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक, विद्यार्थी यांनी बँकाकडून कर्ज घेतले. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच आर्थिक केंद्रे बंद ठेवण्यात आली. परंतु बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज सातत्याने सुरु राहीले. त्यावर उपाय म्हणून अखेर या कर्जदारांवरील व्याजाचा भार हलका करण्यासाठी या कालावधीतील व्याज केंद्र …

Read More »