मुंबई

मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम घेणार छट पूजेच्या पूर्व तयारीचा आढावा मुंबई पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा

मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम उद्या मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या छट पूजा या सणाच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवार दुपारी १ वाजता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई परिसरातील विविध छट पूजा उत्सव …

Read More »

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’ लागू संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन बुधवारी (दि. ८) पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतीलपालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, ७ हजार कोटींचा आरोग्य निधी जातो कुठे ? विलेपार्लेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट , रुग्णांसाठी मुलभूत सुविधा, औषधे व कर्मचा-यांचा तुटवडा

भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस …

Read More »

मंत्रिमंडळाचा निर्णय, एसआरएतंर्गत या तीन जमिनीवर क्लस्टर रिडेव्हलमेंट राबविणार एसआरएअंतर्गत खासगी, शासकीय, निमशासकीय भुखंडावर योजना राबविणार

मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खासगी, शासकीय, निमशासकीय भुखंडावरील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईत झोपड्या व त्याचबरोबर काही जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, बांधकामे, भाडेकरू व्याप्त इमारती, बांधकाम अयोग्य मोकळ्या जागा तसेच काही वस्त्या आहेत. अशा क्षेत्राचा पुनर्विकास नगर …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रयत्न सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्ह मुंबई काँग्रेसची निषेध रॅली

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकीलाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त प्रश्न करून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली करवाई करा जेणेकरून …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन , झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार पहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल २०२५’ चे उद्घाटन

अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराला रत्न आणि आभूषण उत्सवामुळे सध्या नवे रूप आले आहे. या बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनने पुढाकार घ्यावा, राज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईच्या ऐतिहासिक दागिने …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे निर्देश, कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर रहा मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य

कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसेच मनुष्य व पशुहानी …

Read More »

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परः फोन नंबर जाहिर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महसूल आणि वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर …

Read More »

कोंकणातील कातळशिल्प जतन संवर्धनसाठी एमटीडीसी आणि निसर्गयात्री संस्था यांच्यात सामंजस्य करार जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम

जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( konkan Geoglyphs) जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये सामंजस्य करार पार पडला. संयुक्त राष्ट्र पर्यटन (UN Tourism) संस्थे अंतर्गत …

Read More »

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे. अटी व बंधने · परवानगी …

Read More »