बीड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी तर्फे १० लाखाची मदत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बीड – परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेल जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक असून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत! दुर्दैवाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची आयुष्य आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहता, फुल ना फुलाची पाकळी म्हणून एस.टी. महामंडळाकडून त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्याची निर्देश परिवहन मंत्री म्हणून मी एसटी प्रशासनाला दिली आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, बीड- परभणी मार्गावर पहाटे ६ च्या दरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुण मुलांना एसटी बसची धडक बसली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारी मुले चालकाला दिसली नाहीत, असे चालकाचे म्हणणे आहे. दुर्दैवाने या अपघातामध्ये त्या तीनही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बीड आणि परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. यावेळी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर ,बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बीडचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याशी चर्चा करून मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या नातेवाईकांना एस.टी. तर्फे प्रत्येकी १० लाखाची मदत देऊ केली आहे. तसेच शासनातर्फे त्यांच्या कुटुंबीयांना जे काय मदत करणे शक्य होईल, ती मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत. असे आश्वासन यावेळी दिले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम २०२६च्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *