ठाणे, पनवेलकरांसाठी खुषखबर: पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्ग होणार विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण-मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई: प्रतिनिधी
ठाण्याहून पनवेल आणि कर्जत, तसेच ऐरोलीला जाणाऱ्या उपनगरीय प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गाड्या आणि मार्गाची उपलब्धततेमुळे या सध्याच्या मार्गावरील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ लागतो. त्यामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान आणि ऐरोली ते कळवा दरम्यान उन्नत रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून त्यासंदर्भातील मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन बरोबर सिडको आणि राज्य सरकार आज सामंज्यस करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामुळे या भागात प्रवास करणाऱ्यांच्या वेळेत बचत होणार आहे.
एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान वर्षा येथे यासंदर्भातील सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.
याप्रसंगी नगर विकास मंत्री मंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण परदेशी, एमएमएमआरडीए आयुक्त आर राजीव, एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर एस खुराणा, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ सोनिया सेठी, एमआरव्हीसीचे वित्त संचालक अजित शर्मा यांची उपस्थिती होती.

या करारामुळे खालील प्रकल्पांना वेग

पनवेल-कर्जत दरम्यान २८ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका टाकणे २७८३ कोटी

ऐरोली-कळवा दरम्यान ३.५ किमी उन्नत रेल्वे मार्ग बांधणे.४७६ कोटी

विरार-डहाणू दरम्यान ६३ किमी रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करणे (तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका टाकणे) ३५७८ कोटी

नवीन रेल्वे गाड्या खरेदी करणे (४७ रेक्स) ३४९१ कोटी

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या मध्य विभागात ट्रेस पास कंट्रोल. ५५१ कोटी,  तसेच तांत्रिक सहाय्य ६९ कोटी
मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-III) या रु.१०,९४७ कोटी प्रकल्प पुर्णत्व किमंतीच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पास मंजूरी दिली होती.
राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा- २ च्या धर्तीवर ५०:५० आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीच्या ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही ‘अर्थ’ नाही व ‘संकल्प’ही नाही बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार

मुंबई महानगरपालिकेच्या ८० हजार ९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही अर्थ नाही व कोणताही संकल्प नाही असा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *