अजित पवार यांची ग्वाही, ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणारच ‘कल्याण मारहाण’ घटनेची गंभीर दखल घेत विधानसभेत

कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा ‘मान-सन्मान’ राज्यात ठेवला जाईल”, अशा कठोर आणि रोखठोक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातल्या जनतेला आश्वस्त करत, या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे आदेश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत शिवसेना उबाठाचे आमदार सुनिल प्रभू यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करत कल्याण मधील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला अमराठी माणसाने केलेल्या मारहाणीच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सुनिल प्रभू म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात अमराठी लोक मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र येथे येऊन मराठी माणसालाच जर मारहाण करत असतील आणि मराठी माणसे ही मांस-मच्छी मटन खावून घाण करत असल्याचे सांगत असतील अशांना वेळीच जरब बसायला पाहिजे. त्याचबरोबर हा कोण अभिषेक शुक्ला आहे. तो मुख्यमंत्री कार्यालयात आणि मंत्रालयात असल्याचे सांगतो, त्या अभिषेक शुक्ला याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे सांगत या मारहानीचा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याचेही सांगितले.

कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्याची बाब ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’च्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या सभागृहाचे सदस्य सुनील प्रभूं यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा महाराष्ट्र ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात देण्यात आलेली माहिती तातडीने तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान राज्यात ठेवला जाईल, अशाच पद्धतीने प्रशासन वागेल, याची खात्री मी सभागृहाला देतो. त्यावर याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *