Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका,… अराजक पसरवण्याचे ‘मविआ’ चे कारस्थान काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या केलेल्या अवमानाबद्दल राहुल गांधी बोलणार का ?

महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला.

तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना परखड सवालही करत महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना या ना त्या प्रकारे रेटून खोटे बोलत राज्यात अशांतता पसरवण्याचा ‘मविआ’ चा कट आहे असा आरोपही काँग्रेस आणि मविआ केला.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरून मविआ आणि काँग्रेसने नेहमीच हीन दर्जाचे राजकारण केले आहे. मात्र याच काँग्रेसने अनेकदा शिवरायांचा अपमान केला. या घटनांबद्दल राहुल गांधी कधी उत्तर देणार का…या घटनांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का असा सवाल विचारत काँग्रेसकडून झालेल्या शिवरायांच्या अवमानाच्या अनेक दुर्दैवी घटनांचा पाढाच यावेळी वाचला.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख लुटारू राजा असा केला होता. काँग्रेसचे कमलनाथ हे मध्य प्रेदशचे मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने हटवला होता. मविआ चे घटक पक्ष छत्रपती शिवरायांच्या वंशजांकडून पुरावे मागतात. शाहिस्तेखान, अफझलखान नसते तर शिवरायांची ओळख नसती असे वक्तव्य करण्याचे धाडस करतात. त्यावेळी राहुल गांधींनी शिवरायांची, महाराष्ट्राची माफी मागितली नव्हती. हाच काँग्रेस पक्ष आणि मविआ शिवरायांच्या पुतळ्यावरून गलिच्छ राजकारण करत राज्यात अशांतता पसरवण्याचा कट रचत असल्याची टीकाही यावेळी केली.

सांगली येथे बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा उद्योग सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिला भगीनींना काँग्रेसचे खासदार निवडून दिलेत तर बँक खात्यात खटाखट ८.५ हजार टाकू असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल राहुल गांधीनी महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी मागणार का, असा सवालही यावेळी विचारला.

शेवटी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कर्नाटक, तेलंगणा या काँग्रेस शासित राज्यात लाडकी बहीण सारख्या योजना बंद केल्या गेल्या आहेत. राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान मिळवून दिला. या योजनेच्या यशामुळेच ‘मविआ’ च्या पायाखालची जमीन सरकली असून आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा बेछूट खोटे बोलणे सुरू केले आहे. राज्य हे विकासाच्या प्रगतीपथावर जात असताना विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी संविधान, जातीय जनगणना हे मुद्दे उकरून काढत पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा उद्योग मविआ करत आहे. येनकेन प्रकारेण राज्यात अराजक पसरवण्याचा गलिच्छ प्रयत्न शरद पवार, राहुल गांधी, संजय राऊत करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *