वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सरकारकडून कठोर निर्णयाचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

औरंगाबादः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून अनेक जण मास्क वापरण्याचे बंद केले आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा इशारा देत कोरोनावर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रश्नी आपण उद्या मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध घालण्याचे संकेत त्यांनी दिले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका

राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *