मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील वादग्रस्त वास्तू पडल्यानंतर राम मंदीर उभारणीबाबचा मुद्दा भाजपच्या प्रत्येक निवडणूकीच्या जाहीर नाम्यात प्रसिध्द करण्यात आला आहे. मात्र त्या वादग्रस्त जागेवर राम मंदीर उभारणीबद्दल भाजप कधीच बोलत नसल्याचा खुलासा करत त्या वादग्रस्तच्या जागेवर राम मंदीर उभारणीबाबत विरोधकांकडूनच केला जात असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी …
Read More »चहावाल्यांच्या नादीला लागाल… तर औषधालाही शिल्लक राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांना आव्हान
मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आमच्या काळात इतका चहा पित नव्हतो असे सांगत आमच्या चहा पिण्यावर टीका केली. मात्र आम्ही जे स्वत: पितो, तेच आम्ही लोकांना देतो. परंतु तुमचे राष्ट्रवादीवाले जे पितात ते आम्हीही पिवू शकत नाही आणि दुसऱ्यालाही पाजू शकत नाही. २०१४ साली तुम्ही चहा वाल्याच्या …
Read More »शरद पवारांनी राहुल गांधीला इंजेक्शन दिलेय देशाची जनता चार पिढ्यांच्या कारभाराचा हिशोब मागत असल्याचे राहुल गांधीना शाहचे उत्तर
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अर्थात राहुल बाबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील चार वर्षातील हिशोब मागत आहेत. मात्र त्यांच्या पूर्वीच्या चार पिढ्यांनी केलेला राज्य कारभाराचा हिशोब देशातील जनता मागत असल्याचे सांगत राहुल बाबा शरद पवार यांना भेटले असून त्यांनी इंजेक्शन दिल्यानेच ते …
Read More »कार्यकर्त्ये म्हणतात आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची सोय झाली असती भाजपच्या महामेळाव्यावर मनी पॉवरची सांस्कृतिक छाप
मुंबई : प्रतिनिधी कधी काळी सभेला गर्दी जमविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी नागरीकांना पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपकडून आता भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यासाठीही भाजपाने कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याचे उघडकीस येत आहे. मुंबईत पोहोचलेले कार्यकर्त्ये सभेच्या ठिकाणी जायच्या ऐवजी मौज मजा करण्यासाठी मुंबई पर्यटनासाठी जात असून आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची …
Read More »भाजपच्या महामेळाव्याचा उत्सव शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कर्जमाफी योजनेतून ५० लाख शेतक-यांना वगळल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करित असताना भारतीय …
Read More »वाघ आणि सिंह एकत्र ? सध्या शिवसेनेचा विषय अजेंड्यावर नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा खुलासा
मुंबई : प्रतिनिधी आगामी २०१९ च्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनंतर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघ आणि सिंह हे एकत्र असल्याचे जाहीर करत शिवसेनेबरोबरील भाजपची युती कायम राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यास काही दिवसांचा अवधी जात नाही तोच भाजपचे …
Read More »पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणारः खा. अशोक चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय माल्ल्याने बँकांच्या बुडवलेल्या हजारो कोटी रूपयांची वसुली सर्वसामान्यांकडून करण्याचा हा …
Read More »ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन कर्करोगाने वयाच्या ८९ व्या वर्षी निधन
पुणे : प्रतिनिधी राज्यातील एकेकाळचे समाजवादी चळवळीचे अर्धव्यु भाई उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे सोमवारी सांयकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वादू पिंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर पूना हॉस्पीटल येथे उपचार करण्यात येत होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा अभिजित, सून आणि नातवडे असा …
Read More »क्लीन चीट दिलेल्या घोटाळेबाज उद्योग मंत्री सुभाष देसाईंना बडतर्फ करा बक्षी समितीने मंत्री देसाईंवर ठपका ठेवल्याचा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेल्या जमिनी विनाअधिसूचित करताना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एककल्ली व नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतल्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या चौकशीतून निष्पन्न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे …
Read More »दलित, डाव्या संघटनांच्या भारत बंदच्या इशाऱ्यानंतर सरकारला आली जाग सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा मंत्री बडोले यांचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत केंद्र आणि राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीवरून सोमवारी २ एप्रिल रोजी भारत बंदची घोषणा राज्यासह देशभरातील दलित, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी भारत बंदची हाक …
Read More »
Marathi e-Batmya