राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री …

Read More »

पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय

पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू

देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिर गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, …महाराष्ट्र कुठे जातोय? हगवणे कुटुंबातील हुंडाबळी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही; कारण आपण सगळे भारतीय एक आहोत. आज दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई ही कोणतीही वैयक्तिक किंवा राजकीय लढाई नाही, तर ती आपल्या देशाच्या एकात्मतेसाठीची सामूहिक लढाई असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सुप्रिया सुळे …

Read More »

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात मृतांना आर्थिक मदत जाहिर कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी जाहिर केली मदत

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. ही दुर्घटना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यास हादरवून सोडणारी असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

२०३० पर्यंत राज्य सरकार बांधणार ३५ लाख घरेः गृहनिर्माण धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन सरकारचे उद्दिष्ट

राज्याच्या गृहनिर्माण धोरण २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘माझे घर, माझा अधिकार’ हे ब्रीद अनुसरून वर्ष २०३० पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृहनिर्माण धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणात डाटा आधारित निर्णय प्रक्रिया, आधुनिक …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय वाशिम, महानगर गॅस, सुलवाडी जामफळ, अरूणा प्रकल्प, पोशीर आणि शिलार प्रकल्पाला निधी मंजूर

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पडली. या बैठकीत वाशिम येथील दिवाणी न्यायालयासाठी आवश्यक पदे उपलब्ध करून देणे, देवनार येथील भूखंड महानगर गॅसला सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय, सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी ५ हजार ३२९ कोटींची मान्यता, सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी, रायगडमधील पोशीर …

Read More »

अखेर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठा विजय मिळवित पुन्हा एकदा राज्यात सत्तास्थानी विराजमान झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात राजकिय वादाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काल रात्री उशीरा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बँकाना आदेश, शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता कर्ज द्या सन २०२५-२६ च्या ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटींच्या पत पुरवठा आराखड्यास मंजुरी

शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापूर्वी यासंदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकावर ‘एफआयआर’ देखील दाखल केले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्याचे ” पार्किंग ” धोरण लवकर आणणार वाहतुक कोंडीच्या समस्येवर उपाय

वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक …

Read More »