ॲड प्रकाश आंबेडकर यांची मागणी, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना १ कोटीची भरपाई द्या ॲड प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात त्यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबियांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या काही प्रमुख मागण्या –

1) परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.

2) सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.

3) परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा;

4) १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत.

5) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.

अशा पाच मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या बैठकीत केल्या.

तसेच प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले असल्याचेही यावेळी सांगितले.

 

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *