शिवसैनिकांनो फक्त मतच नाहीतर मनही जिंकायचं शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी

आगामी निवडणूका कधीही लागू शकतात. त्यामुळे शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत घेवून जायची असल्याने फक्त जनतेची मतेच नाहीतर मनही जिंकायची अशी घोषणा राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी स्वबळावर निवडणूका लढायच आणि जिंकायचच असा निर्धार शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी केले.

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात गोरेगांव येथील नेस्को संकुलात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवून कामाला लागले पाहिजे असे आवाहन करत शिवसेनेला फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादीत न ठेवता देशभरात न्यायची असल्याची घोषणा करत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत शिवसेनेने जिद्दीने आणि चिकाटीने लागली तर काय होवू शकते हे सिनेट निवडणूकीत दाखवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *