पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन यांना पाठिंबा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …
Read More »सचिन सावंत यांची टीका, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ एमसआरडीसीने मुंबईच्या उड्डाणपुलाची जबाबदारी महानगरपालिकेकडे ढकलली
मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?
राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित …
Read More »गणेशभक्तांच्या टोलमाफीसाठी एकनाथ शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात श्रेय वादाची लढाई कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी
मागील अनेक वर्षापासून गणेशोत्सवाच्या सण काळात सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून कोकणात जाऊ गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याची चढाओढ लागत असे. त्यामुळे ज्या मतदारसंघात कोकणवासिय जास्त भागातील मतदार कम नागरिकांसाठी एक प्रकारचे आमिष म्हणून मोफत बसने कोकणात नेले जात असे. त्यानंतर आता कोकणवासियांकडे वाहन घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर या वाहनांना …
Read More »कल्याण – डोंबिवली , चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत, पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश
कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह ७ माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या ९ माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याप्रकऱणी केली टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या प्रकरणावर …
Read More »राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून ५० लाखांचा धनादेश सुपूर्द
चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५ व ३६ मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या. तसेच मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. रामगिरी शासकीय निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मतचोरीचे संबध मतदार अधिकार यात्रा नवादा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप
‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …
Read More »
Marathi e-Batmya