आमच्या नेत्यांना गणेश नाईक तुम्ही नालायक म्हणत अहात. मात्र नालायकपणाची एक व्याख्या असते. तुमच्या नालायकपणाचे व्हिडीओ नवी मुंबईच्या गल्लीत पूर्वी फिरत होते. नंतर ते व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्स अपच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजले. भविष्यात हेच व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातील, असा कडक शब्दात शिवसेनेने एका पत्रकार परिषदेत गणेश नाईक …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, महाराष्ट्रात ‘ई-बॉन्ड’ क्रांती आयात-निर्यात व्यवहारांसाठी आता डिजिटल बॉन्ड, कागदी स्टॅम्प पेपरला 'गुडबाय'
महाराष्ट्रातील व्यापार व उद्योग जगताला मोठा दिलासा देत, राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ‘ई-बॉन्ड’ प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणारे हे पाऊल असून, व्यवहार सुलभ करणाऱ्या प्रक्रियेला गती देईल. असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चंद्रशेखर …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे संकेत, क्रोप्टोकरन्सी धोरणात बदल अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफकडून मात्र आक्षेप
भारताच्या क्रिप्टोकरन्सी धोरणात संभाव्य बदलाचा इशारा देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी (३ ऑक्टोबर २०२५) सांगितले की, देशांना स्टेबलकॉइन्सशी “सहभागी होण्याची तयारी” करावी लागेल, मग ते बदलाचे स्वागत करत असोत किंवा नसोत. हे अशा वेळी घडले आहे जेव्हा अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोघांनीही खाजगी क्रिप्टोकरन्सी किंवा व्हर्च्युअल …
Read More »एकनाथ शिंदे यांचा पलटवार, कधी छदाम तरी दिला का, आम्ही देणेकरी आहोत विचार बाळासाहेबांचे आणि स्तुती भाजपाच्या मोदी यांची
शिवसेना उबाठाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार म्हंटल्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे दसरा मेळावा घेणार अशी चर्चा सुरु झाली. आधी शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा वरळीच्या डोममध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नंतर ऐनवेळी हा दसरा मेळावा गोरेगांव मधील नेस्कोच्या मोठ्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. त्यामुळे शिंदे यांचे …
Read More »भरपावसात उद्धव ठाकरे यांची टीका, वाघाचं कातडं पाघंरणाऱ्या गाढवाची गोष्ट माहित आहे का ? अमित शाहचे जोडे त्यांनाच लखलाभ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपावर टीका
शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. परंतु संध्याकाळपासून अचानकच कधी पाऊस तर कधी ऊन असे निसर्गाचे चित्र पाह्यला मिळत. त्यातच पाऊस सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते मंचावर उपस्थित होते. या भरपावसातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तमाम शिवसैनिकांना दसऱ्याच्या सुरुवात केली. उद्धव ठाकरे …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या बीडच्या नारायण गडावरून पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांची मागणीही आणि इशारा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे. मनोज जरांगे …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल,भारतातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला कोलिंबियाच्या ईआयए विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना केला हल्लाबोल
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे प्रतिपादन केले. कोलंबियाच्या ईआयए EIA विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना, राहुल गांधी यांनी “रचनात्मक त्रुटी” या मुद्द्यावर प्रकाश टाकला आणि …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, तात्कालीन विरोधी पक्षनेत्यांचे पत्र मुख्यंत्र्यांना पाठवू का? ओला दुष्काळाची तरतूदच नसल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावरून साधला निशाणा
राज्यात मराठावाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर व उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर तात्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असून नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाची तरतूदच नसल्याचे जाहिर केले. त्याच वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना उबाठाचे …
Read More »केशव उपाध्ये यांची टीका, उद्धव ठाकरे सरकारची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना धत्तुरा देणारी शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे यांच्यावर उपाध्ये यांची बोचरी टीका
उद्धव ठाकरे आणि मविआचे घटक पक्ष, महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ५० हजार एकरी मदत लागलीच द्यावी असा आग्रह धरत आहेत. मात्र त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या तोंडाला कशी पाने पुसली होती हे आठवावे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमाफी ही फसवी होती. अटीशर्ती सोबत देऊ केलेली कर्जमाफी म्हणजे राज्य सरकारची बनवाबनवी …
Read More »मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी ७५,००० प्रशिक्षणार्थींना ‘ मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामधून एकूण २,५०६ तुकड्या सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते …
Read More »
Marathi e-Batmya