Tag Archives: भाजपा

इस्रायलच्या युद्धात इराणने मानले भारताचे आभार १२ दिवसांच्या युद्धात एकतेचा संदेश दिल्याबद्दल दिले धन्यवाद

इराणने “भारतातील थोर आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे” त्यांच्या नैतिक पाठिंब्याबद्दल आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलविरुद्धच्या ‘१२ दिवसांच्या युद्धा’त एकतेचे संदेश दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. अलीकडील लष्करी संघर्षात विजयाचा दावा करत, नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने राजकीय नेतृत्व, सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांसह इतरांचे आभार मानले आहेत, जे तेहरानच्या बाजूने खंबीरपणे आणि आवाजात …

Read More »

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, अघोषित आणीबाणी… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नाकारणरे वाचविण्याबाबत बोलत आहेत

देशात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२५ जून २०२५) केला आणि भाजपाने त्यांचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठी संविधान हत्येचा “नाटक” रंगवल्याचा आरोप केला. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि …

Read More »

राहुल गांधी यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडे घोषणा देण्याची कला…. मेक इन इंडिया असूनही उत्पादन उत्पादन निचांकी पातळीवर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (२१ जून २०२५) म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “घोषणा देण्याची कला” आत्मसात केली आहे. परंतु कोणतेही उपाय देत नाहीत आणि असा आरोप करत देशात ‘मेक इन इंडिया’ उपक्रम असूनही भारताचे उत्पादन विक्रमी नीचांकी पातळीवर असल्याची टीका केली. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व …

Read More »

लालू प्रसाद यादव यांचा मोदींवर पलटवार, खोट्यांचा जोरदार पाऊस खोट्या आश्वासनाचा सध्या गारवा

बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज चवथा दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासावरून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. तसेच काँग्रेसचा हाथ त्यांच्यासोबत असल्याचा खोचक टीकाही यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेवरून राष्ट्रीय जनता दलाचे …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा आरोप, राजद आणि काँग्रस बिहार विरोधी ऑपरेशन सिंदूरपासून बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा चवथा दौरा

बिहारमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२० जून, २०२५) सिवानला भेट दिली आणि बिहारला दलदलीत नेल्याबद्दल विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलावर टीका केली, गेल्या एका दशकात बिहारला पुढे नेण्यासाठी एनडीए NDA सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखविली. पंतप्रधान मोदींनी ₹ ९.५ कोटी किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना आव्हान, कम ऑन किल मी, पण येताना रूग्णावाहिका आणा प्रहार चित्रपटातल्या नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन प्रमाणे माझे विरोधकांना आव्हान

मी काही वर्षापूर्वी प्रहार चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट कोणाचा होता ते माहित आहे का, तो चित्रपट अभिनेता नाना पाटेकर याचा होता. त्या चित्रपटात नाना पाटेकर जेव्हा तो गुंडासमोर उभा राहतो त्यावेळी तो म्हणतो की, कम ऑन किल मी त्याप्रमाणे मी आज विरोधकांना मी म्हणतो की, कम ऑन किल मी. …

Read More »

काँग्रेस नेते स्व.वसंतदादा पाटील यांची नात सून जयश्री पाटील भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये घालविलेले स्व.वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे,स्व वसंतदादा पाटील यांचे पुत्र मदन पाटील हे काँग्रेसमधूनच आमदार आणि खासदार पदी निवडूण आले. तर काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणूनही राहिले. …

Read More »

राज ठाकरे यांचा सरकारला इशारा, हिंदी सक्ती हा महाराष्ट्रद्रोहच हिंदी भाषा कशी शिकवता ते बघतोच!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत त्रिसुत्री भाषा धोरणानुसार हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यात आली. मात्र त्यास सर्वच विरोधी पक्षियांनी विरोध केल्यानंतर आता राज्य सरकारने हिंदी भाषेला भारतीय भाषेचा पर्याय ठेवला आहे. मात्र त्यास २० विद्यार्थ्यांची अट कायम ठेवली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्याने शासन निर्णय जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख …

Read More »

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरोप, भारतीय परराष्ट्र धोरणाला तिसरा धक्का अमेरिकेचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना जेवणाचे आमंत्रण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित करणार असल्याचे वृत्त पुढे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत म्हटले की, हा भारतीय परराष्ट्र धोरणासाठी “तिहेरी धक्का” आहे आणि “आता अमेरिकेशी व्यवहार करणे देखील आपल्यासाठी एक मोठे आव्हान बनले आहे” असल्याची भीतीही …

Read More »