Tag Archives: मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान मोदींकडून शोक मुख्यमंत्री शिंदेंकडून पाच लाख तर पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहिर

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले, पाच-सहा लाख देऊन प्रश्न सुटणार नाहीत… समृध्दी महामार्गावरील सततच्या अपघातावरून राज्य सरकारला सल्ला

समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फक्त अपघातील मृतांच्या नातेवाईकांना चार-पाच लाख रूपये देऊन प्रश्न सुटणार नाही तर रस्ते तज्ञांना बोलावून याची …

Read More »

समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू आठ जणांनी स्वतःचे प्राण वाचविले तर आठ जण जखमी

समृध्दी महामर्गावरील अपघाताची मालिका सातत्याने सुरुच असून शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर राज्यभर हळहळ …

Read More »

वर्षपूर्तीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आमदारांचा श्वास गुदमरू लागला… शिवसैनिकांच्या मनातील उद्रेकाला वाचा फोडण्याचं काम केलं

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त ठाण्यातल्या टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षभरापूर्वी (महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात) शिवसेना आणि भाजपाच्या गोटात काय घडलं याबाबत बरीच माहिती उलगडून सांगितली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्यातल्या जनतेचं जगणं असहाय्य …

Read More »

पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन एक वर्षाच्या काळात घेतले लोकाभिमुख निर्णय

राज्य शासन हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय देणारे शासन आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात शासनाने लोकाभिमुख विविध निर्णय घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावांतील १२२ कोटी ५९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे ई – भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी …

Read More »

नाना पटोले यांची टीका; हे ‘कुराज्य’ लवकर जावे, हीच राज्यातील जनतेची इच्छा भ्रष्ट, ईडी सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळात महाराष्ट्र १० वर्ष मागे

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन वर्ष झाले. हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला १० वर्ष अधोगतीकडे घेऊन जाणारे ठरले आहे. राज्यात हे असंवैधानिक, असंवेदनशील, भ्रष्ट ‘कुराज्य’ असावे असे स्वाभिमानी जनतेला अजिबात वाटत नसून लवकरात लवकर जावे हीच …

Read More »

दिल्लीत औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्याला डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव नवी दिल्ली नगरपालिकेच्या मंजूरीनंतर रितसर नामकरण

नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) बुधवारी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एका रस्त्याचं नाव औरंगजेब लेन असं होतं जे आता बदललं जाणार आहे. या रस्त्याला भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं जाणार आहे. एनडीएमसीच्या बैठकीत बुधवारी २९ जून रोजी याबाबतच्या निर्णयाला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे साकडे, ‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा संपन्न

बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या …

Read More »

खासदाराचे नेमके काम काय? जीव धोक्यात आल्याने मतदाराने लिहिले खासदारांना पत्र राहुल शेवाळे यांना पत्र पाठवित करून दिली जबाबदारीची जाणीव

देशाच्या धोरणाला दिशा मिळावी म्हणून निवडून दिलेले खासदार निवडल्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करतात परंतु आता निवडणूक जवळ आल्याने प्रसिद्धीसाठी गटारावर अनधिकृतरित्या उभ्या राहिलेल्या मंदिराची उभारणी करताहेत, हे बेकायदेशीर काम केल्याने जीव धोक्यात आलेल्या नागरिकांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांना अनावृत्त पत्र लिहिले असून ते सध्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील कृषी, जलसंपदा आणि जमिनींशी संबधित इतर महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेतले निर्णय

अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे “सिट्रस इस्टेट” तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे …

Read More »