Breaking News

Tag Archives: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे कुटुंबियासोबत पंतप्रधान मोदी यांना भेटले, “पण आज आई असायला हवी होती…” इर्शाळगड ते धारावी सर्व विषयांवर चर्चा झाल्याची माहिती

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसा पाठवित सात दिवसात लेखी म्हणणे मांडण्याची मुदत दिली. त्याचबरोबर राज्यातील भाजपाप्रणित सरकार कायम टीकविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट फोडत सरकारमध्ये सहभागी करून घेतला. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदल लवकरच होणार अशी चर्चा सुरु असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतरीत पुनर्वसन इर्शाळवाडी घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू मुख्यमंत्री घटनास्थळावर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार …

Read More »

मोठी दुर्घटनाः रात्रीत इर्शाळवाडीतील ४० घरांवर दरड कोसळली दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे आणि रेल्वे महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याचे घटना उघडकीस येत आहे. त्यातच माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ कर्जत तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली. इर्शाळवाडी येथे आदीवासी ठाकर समाजाची वस्ती असून यातील ४० …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेणाऱ्यांवर कारवाई प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीची घोषणा

मीरा भाईंदर येथील जनतानगर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत (बीएसयूपी) मोफत सदनिका देण्यात आल्या होत्या. यात काही लाभार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून त्या सदनिका ताब्यात घेतली जातील आणि याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश सर्व शासकिय कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना लवकर सोडले

मुंबईसह राज्यातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल, शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

राज्यातील भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेत पाठिंबा दिला. त्यानंतरचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्र आता विरोधी पक्षनेत्यानेच आपल्या पदाचा राजीनामा देत सरकारमध्ये सहभागी झाल्याने विरोधकांची थोडी गोची …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अजित पवार पहाटे काम करतात तर फडणवीस ऑल राऊंडर आणि मी…. विरोधी पक्ष आहे कुठे?

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या बोली भाषेतून चौकार षटकार लगावले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भर पत्रकार परिषदेत पत्रकारांमध्ये हशा पिकला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार, …

Read More »

पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार मांडणार ही १४ विधेयके आणि ६ अध्यादेश शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात महत्वाची विधेयके

राज्यातील भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदार सहभागी झाले. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारची ताकद विधिमंडळात चांगलीच वाढली आहे. तसेच या सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन होत असून या अधिवेशनात १४ विधेयके विधिमंडळाच्या सभागृहात मांडण्यात येणार आहेत. या विधेयकामध्ये …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, विरोधकांचे पत्र नव्हे ग्रंथच… जितक्या लक्षवेधी आलेल्या आहेत त्यातील मुद्दे उचलून पत्र पाठविलेले दिसते

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे पहिलेच तर शिंदे-फडणवीसांचे दुसरे पावसाळी अधिवेशन आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे-फडणवीस-पवार सरकारने प्रथेप्रमाणे विरोधकांना चहापान कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र राज्यासमोरील प्रश्नांची यादी वाचून दाखवित दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर विरोधकांनी पत्र पाठवित बहिष्कार टाकला. चहापानानंतर सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधारी मुख्यमंत्री …

Read More »