Tag Archives: मुख्यमंत्री

नाना पटोले यांची मागणी, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा, डीजीपी रश्मी शुल्कांना निलंबित करा बदलापूर प्रकणातील आपटे व महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटे अजून मोकाट कसे?

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर घटनेतील आरोपी आपटे व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले काय? असा …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी, जन्मठेप शिक्षा तरतूदीचे अपराजिता विधेयक एकमताने मंजूर विशेष अधिवेशन बोलावित विधेयकाला एकमताने मंजूरी

काही दिवसांपूर्वी आर जी कार रूग्णालयात कामावर हजर असलेल्या महिला प्रशिक्षार्थी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले. तर भाजपाकडून अद्यापही सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभेने आज मंगळवारी ममता बॅनर्जी सरकारने आणलेले बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा …

Read More »

कोलकाता येथील आंदोलनाला हिंसक वळण, नबन्नाकडे जाण्याचा प्रयत्न आरजी कार रूग्णालयातील घटनेवरून आंदोलन

कोलकाता पोलिसांनी मंगळवारी आंदोलकांचे फोटो जारी केले असून या हिंसक आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला आणि आदल्या दिवशी हिंसाचार केला. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्समधून आत घुसून पश्चिम बंगाल सचिवालय ‘नबन्ना’ कडे मोर्चा वळविण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत होते. तृणमूल काँग्रेसचे …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, अन्यथा श्रीलंका- बांग्लादेशसारखी स्थिती पोलिसांना सत्ताधा-यांच्या जवळच्या गुंड माफियांच्या सुरक्षेला, महिला मुलींची सुरक्षा कोण करणार?

राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला मराठी माणसांपेक्षा गुजरातच्या भल्याची जास्त चिंता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला लुटून गुजरातचे भले करणे हाच एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. राज्याची लूट थांबवून जनहिताची कामे करा अन्यथा तुमची अवस्था श्रीलंका, बांग्लादेशच्या सत्ताधा-यांप्रमाणे होईल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विकसित भारतासाठी एमएमआर प्रदेश पॉवर हाऊस नागरी विकास, पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूक येणार

भारताच्या ‘फाईव्ह ट्रिलीयन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यात मुंबई महानगर प्रदेशाचा सिंहाचा वाटा राहणार आहे. या प्रदेशातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, एमएमआर प्रदेश २०४७ मधील विकसित भारतातील अर्थव्यवस्थेसाठी ‘पॉवर हाऊस’ ठरणार असून, यातील दळणवळण, शाश्र्वत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलपणे… मार्ड संघटनेकडून संप मागे घेण्याची घोषणा

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वंकष आढावा घेण्यात यावा. त्यासाठी राज्यस्तरावर, तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयांसाठी समन्वनासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात यावी. तसेच निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवास व्यवस्था, वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रय़त्न करावेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विद्यावेतन नियमितपणे मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री …

Read More »

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोर्टाची ती ऑर्डरच दाखविली मावळ मधील आरोपीला २०२४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावल्याची दिला संदर्भ

बदलापूर येथील अत्याचाराच्या विरोधात उसळलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, बदलापूरचे आंदोलन राजकिय हेतूने प्रेरित होते. या आंदोलनात बाहेरील लोक सहभागी झाले होते, तर स्थानिक लोक बोटावर मोजण्याइतके होते. त्याचबरोबर दोन महिन्यापूर्वी अशाच एका प्रकरणात राज्य सरकारने फाशी दिल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून …

Read More »

निती आयोगाकडून मुंबई महानगराचा २६ लाख कोटींचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याच …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …

Read More »