Tag Archives: शरद पवार

गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल

पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …

Read More »

शरद पवार यांचा विरोध, पहिली ते चौथी इयत्तेत हिंदी भाषा सक्ती करणं योग्य नाही हिंदीची सक्ती नको, महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेश नाही

पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. सरकारने तसा हट्ट करू नये. आज देशातील ५५ टक्के लोक हिंदी बोलतात ती सुसंवादाची भाषा असू शकते. हिंदीबद्दल महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेष नाही पण म्हणून हिंदीची सक्ती नको अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचे-सुप्रिया सुळे

महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं गेलं. सुदैवाने त्यावेळेला राज्याची सूत्रं माझ्याकडे होतं. पण निर्णय घेताना अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी विरोध होत होता. मानसिकता बदलायची आवश्यकता होती. समाजातल्या पुरुष वर्गाची ती मानसिकता त्या काळात बदलली नव्हती. हल्ली सुद्धा तीच मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते. असे राष्ट्रवादी …

Read More »

जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे वक्तव्य करताच कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमातच नकारघंटा २६ व्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय झालेला असल्याने ७ वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून जयंत …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा विश्वास, पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच वाढणार

यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. ‘लडेंगे और जितेंगे’, असा विश्वास पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करत महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार आहे असा …

Read More »

शरद पवार यांचे आवाहन, कोणं गेलं याची चिंता करू नका, ५० टक्के महिलांना निवडूण आणा तुमच्या कष्टामुळे आज आपण २६वा वर्धापन दिन साजरा

दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात ५० टक्के महिलांना संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार मार्गदर्शन करताना बोलत होते. शरद पवार बोलताना म्हणाले की, मुलींना संधी मिळाल्यानंतर …

Read More »

पुण्यात अजित पवार यांची ताकद मोठी की शरद पवार यांची शक्ती प्रदर्शनात दिसणार वर्धापन दिन मेळाव्यांतून दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाची दोन्ही राष्ट्रवादींकडून स्वतंत्रपणे तयारी करण्यात आली आहे. आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होत असलेल्या या वर्धापन दिनास विशेष महत्व आले आहे. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले खरीप हंगामासाठी सरकारची तयारी नाही, खते, बि बियाण्यांचा पुरवठा मुबलक ठेवा, बोगस बियाणे, लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा

राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. …

Read More »

शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे केले अभिनंदन भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखली

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, गृहमंत्र्यांची भूमिका समंज्यसपणाची समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी मांडली भूमिका

पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना सोडणार नाही असे वक्तव्य केले. तसेच या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात काही निर्णयही घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी भूमिका स्पष्ट …

Read More »