Tag Archives: अदानी

इंडिगो प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल मक्तेदारी मोडून काढण्याची केली मागणी

इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, डिजीसीए DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, पंतप्रधान मोदी अदानी अंबानीसाठी नाचतीलही पण निवडणूका झाल्यानंतर मात्र ते परत येणार नाहीत

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि ते मतांसाठी “नाटक” करत असल्याचा आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आरोप केला. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी लोकांचे ऐकत नाहीत आणि निवडणुकीनंतर “गायब” होतात. राहुल …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, अदानीसाठी रथयात्रा थांबविण्यात आली समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द कायद्यातून काढून टाकण्याची योजना

ओडिशातील भाजपा सरकार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की गेल्या महिन्यात भारतीय अब्जाधीश आणि त्यांच्या कुटुंबासाठी जगन्नाथ यात्रा रथ थांबवण्यात आले होते. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “जेव्हा ओडिशात जगन्नाथ यात्रा काढली जाते, तेव्हा रथ (रथ) ओढले …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, धारावी पुनर्विकास की देवनार २३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा? लाडक्या उद्योगपतीसाठी राज्य सरकार व बीएमसीकडून पायघड्या, घरे अदानी बांधणार, बीएमसी जागा मोकळी करून देणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई महापालिकेवर २३६८ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार टाकण्यात आला आहे. प्रकल्पातून अपात्र ठरणाऱ्या धारावीतील नागरिकांना “रेंटल हाउसिंग”मध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, यासाठी अदानी धारावी पुनर्विकास प्रा. लि. तब्बल ५०,००० घरे उभारणार आहे. मात्र ही घरे बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून देवनार डम्पिंग ग्राउंड खाली करण्याचा प्रस्ताव …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीला आणखी १३ लाख चौरस फूट जागेचा TDR देण्याचा घाट भाजपा युती सरकार पंतप्रधानांच्या मित्रासाठी सरेंडर, म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा फायदाही अदानीलाच?

अदानीचा एक लाख कोटी रुपयांचा धारावी विनाश महाघोटाळा दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. या महाघोटाळ्याचा नवा अध्याय म्हणजे, अदानी सरकार अदानीला तब्बल १३.३९ लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र (sale incentive area) TDR स्वरूपात गिफ्ट देऊ इच्छित आहे. ते पण अशा पुनर्वसन घरांसाठी/ गाळ्यांसाठी, जे अदानीने बांधलेले देखील नाहीत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन तात्काळ मागे घ्या, थेट जनसुनावणी घ्या सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता एमआरटीपी MRTP चे उल्लंघन

भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा अधिकार डीआरपीए- अदानीला कोणी दिला? धारावी पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे रिअल इस्टेट साम्राज्य उभारण्याचा प्रकल्प

धारावी हा पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे साम्राज्य उभारण्यासाठीचा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. या प्रकल्पातून धारावीकरांचे हित साधले जाणार नाही तर फक्त आणि फक्त अदानीचे टॉवर उभे राहणार आहेत. पण अदानी सरकार व अदानीचे दलाल जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत. काँग्रेस व धारावीकरांचा अदानी विनाश प्रकल्पाला विरोध आहे. या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नाही तर अदानीच्या ‘लगान’ वसुलीसाठी झोपडपट्टीतील छोट्या व्यावसायिकांवर कर आकारणी मोठा आर्थिक आघात, मुंबईकरांचा आर्थिक कणा मोडणा-या निर्णयाला काँग्रेसचा विरोध

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा जुमलेबाजी आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना लुटून लाडके उद्योगपती व लाडके कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. मुंबईतील छोट्या उद्योगांवर कर आकारण्याचा निर्णय हा कष्टकरी मुंबईकरांना लुटणारा आहे. दोनपैकी एक मुंबईकर झोपडपट्टीत राहत असल्याने हा त्यांच्यावरचा मोठा आर्थिक आघात आहे, त्यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल बीएमसीच्या या …

Read More »

प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींच्या राजवटीत…फक्त उद्योगपती अदानीच सेफ काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव

विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार… जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यास इंडिया आघाडी आग्रही, भाजपा व पंतप्रधान मोदींचे मात्र मौन

देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम …

Read More »