Tag Archives: अदानी

प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींच्या राजवटीत…फक्त उद्योगपती अदानीच सेफ काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव

विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार… जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यास इंडिया आघाडी आग्रही, भाजपा व पंतप्रधान मोदींचे मात्र मौन

देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका

शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. धारावीबाबत आज पुन्हा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आशिष शेलार यांना आव्हान, धारावी प्रकरणी चर्चेची तयारी धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत सर्वात मोठा जमीन घोटाळा, भाजपा नेते अदानीचे एजंट आहेत का ?

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या अदानीला जमीन देण्यासाठीच घेतल्या का, अशी शंका येत आहे. मुंबईतील हा मोठा जमीन घोटाळा असून एका व्यक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांचा धारावी प्रकल्पाचा अभ्यास नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावे …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, हुतात्म्यांच्या बलिदानातील मुंबई गुजरातच्या… सत्तेत आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महारांजांचे मंदीर बांधणार

मला एका गोष्टींचे वैष्यम वाटत असून आमच्या विरोधात लढण्यासाठी चेल्या टपाट्यांचा आधार घेऊन त्यांना नेते म्हणून स्थान देत मोदी-शाह यांना आमच्याशी लढावे लागत आहे. पण मी १०६ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मिळवलेली मुंबई कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या मोदी शाह यांच्या अदानीला मिळू देणार नाही असा निर्धार वजा इशारा शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, …तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण ठाकरेंची चवथी पिढी

मुंबईत दसरा दिनानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाचा परंपरागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पहिल्यांदाच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे भाषण करणार होते. त्यामुळे आदित्य ठाकरे पहिल्या दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जोपर्यंत अदानीची कामे होत नाहीत. तोपर्यंत राज्यात …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, लुटीसाठी बीएमसीची निवडणुक घेत नाही का? अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम

‘मुलुंड मध्ये पीएपी प्रकल्प अजून सरकारने रद्द केलेला नाही. फक्त मिहीर कोटेचा म्हणतात तो प्रकल्प रद्द होणार आहे. पण धारावी प्रकल्पात ७०% जमीन बीएमसीची आहे. त्यामुळे प्रीमियम मिळताना ५ हजार कोटी मुंबई महापालिकेला मिळायला हवेत अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत त्याचबरोबर १ ते २ हजार कोटी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीच्या स्वार्थासाठी मित्रजीवी सरकारचा…. भाजपा शिंदे सरकारने अदानीचे एजेंट म्हणून काम करू नये; कोण आहे अदानी? सरकार त्याच्यासाठी पायघड्या घालते.

भाजपा युती सरकारने मुंबई अदानीला विकली असून सर्वसामान्य मुंबईकरांना विस्थापित करण्याचे पाप केले जात आहे. लाडका उद्योगपती योजनेखाली सरकार केवळ अदानीच्या स्वार्थासाठी काम करत आहे. आता हे मित्रजीवी सरकारने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बसेरा गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत असलेल्या कुटुंबांना उध्वस्त करायला निघाले आहे पण ही तानाशाही काँग्रेस सहन करणार नाही. …

Read More »

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी यासाठी निविदेतील नियमावली त्या पद्धतीने तयार करण्यात आली. तसेच पराभवाच्या छायेत असलेल्या राज्य सरकारने सत्तेच्या शेवटच्या दिवसातही अदानी कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी पाठपुरावा केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत या कंत्राटाच्या अनुषंगाने …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीसाठी भाजपा-शिंदे सरकारचे तुघलकी फर्मान कुर्ल्यातील शासकीय कर्मचा-यांना बेघर करणारी नोटीस

राज्यातील भाजपा युती सरकारला जनाची नाही आणि मनाचीही नाही. दोन गुजराती मालकांच्या आदेशाने काम करणारे युती सरकार मुंबईकरांच्या जीवावर उठले आहे. मुंबई अदानीला विकूनच शिंदे-फडणवीसांचा आत्मा शांत होईल असे दिसत आहे. कुर्लाच्या मदर डेअरी कर्मचारी वसाहतीतील कुटुंबांना पर्यायी व्यवस्था न देताच १५ दिवसात घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. …

Read More »