दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सरकारी पोलिसी वाहनातून रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोप राज्यातील महायुती सरकारवर केला. त्यासंदर्भात आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितले की, त्या आरोपानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व वाहने तपासण्याचे …
Read More »निवडणूक आयोगाकडून पोलिस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर केली नियुक्ती
काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार उशीरा का होईना निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविले. तसे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नव्या नावाची घोषणा करण्यासंदर्भात तीन आयपीएस अधिकाऱ्यांची सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहविभागाला दिले. त्यातून …
Read More »रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, निवडणूक आयोगाचा निर्णय अगदी… आता दिर्घकाळ त्या पदावर राहणार नाही याकडेही लक्ष द्यावं
काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मानलेल्या भगिनी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे सातत्याने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी केली होती. …
Read More »नाना पटोले यांची प्रतिक्रिया, धन्यवाद, पण रश्मी शुक्लांना हटविण्यात वेळ का लागला? निवडणुकीसंदर्भातील कोणतेही काम रश्मी शुक्ला यांना देऊ नका
वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना …
Read More »निवडणूकीपूर्वी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय रश्मी शुक्ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आदेश
राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही दोन वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थात भाजपाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रश्मी शुक्ला यांची पोलिस महाचसंचालक पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी सातत्याने काँग्रेसने दोन वेळा राज्याचे निवडणूक मुख्याधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. …
Read More »सर्वोत्तम तंत्रज्ञानाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प (Cyber Security Project) जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यात, त्यांना दिलासा देण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहत …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला स्मरणपत्र रश्मी शुक्लांची मुदतवाद विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा पोहचणारी
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उच्च पदावर असलेल्या अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करतात, अशा पक्षपाती अधिकाऱ्यांमुळे विधानसभा निवडणूक पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडतील याबाबत शंका असल्याने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी पुनश्च मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला ह्या अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत. शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली आहे. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त पाहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी …
Read More »अंबादास दानवे म्हणाले, लाडक्या बहिणी पेक्षा सुरक्षित बहीण हवी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात “लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी” या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक डॉ. …
Read More »विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा: काँग्रेसची मागणी राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच विशाल गडावर मोर्चा काढणार याची पोलीसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून …
Read More »
Marathi e-Batmya