Tag Archives: भाजपा

एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला. पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ …

Read More »

काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?

भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार ७५ वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान …

Read More »

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे पोलिस ठाण्याच्या आवारातच धरणे आंदोलन

लोकसभा निवडणूकीसाठी ४ थ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उद्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र प्रथेनुसार प्रत्येक सत्ताधारी पक्षाकडून निवडणूकीच्या आदल्या रात्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखविण्यात येतात. याच प्रलोभनाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम टॉनिकचा वापर करण्यात येतो. पुण्यातील काँग्रेसचे आमदार तथा लोकसभेचे उमेदवार …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्राचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या मुलाखतीतवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत पाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना देत याची उत्तरे देण्याचे …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने देशासाठी काय केले असा प्रश्न विचारत निवडणुकीत विकासाच्या कामावर मते मागितली पाहिजेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. उठसूट मुघल, …

Read More »

शशी थरूर यांचा विश्वास, देशभरातील हवा बदलली… जनतेच्या प्रश्नावर भाजपा गप्प

लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. ४ जूनला दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार …

Read More »

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी मुस्लिम लीगचीच भाषा बोलताहेत

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी सध्या मुस्लिम लीगचीच भाषा बोलत असून उद्धव ठाकरे, इंडी आघाडीला मत म्हणजे व्होट जिहादच्या समर्थकांना मत देण्यासारखे आहे, अशी अशी जळजळीत टीका भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी रविवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राणे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून ते …

Read More »

मेहबुबा मुफ्ती यांचा आरोप, निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्या…

लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर पुलवामा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली होती आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतल्याचा दावा पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी केला. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी १३ मे रोजी मतदान होणार असलेल्या पुलवामामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊन आणि ताब्यात घेऊन निवडणुका …

Read More »

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे भक्त) प्रत्येक रस्त्यावर फिरत आहेत. आपला भाऊ “तोफ” असल्याच्या ओवेसींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणा म्हणाल्या की अशा “तोफ” त्यांच्या घराबाहेर सजावटीसाठी ठेवल्या आहेत. ती एका सैनिकाची मुलगी असल्याचे सांगत नवनीत राणा म्हणाल्या की, “आम्ही बाहेर …

Read More »

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरील चर्चेचे निमंत्रण स्विकारले

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या जाहीर चर्चेचे निमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी चर्चेचे निमंत्रण दिले. या तिघांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना २०२४ …

Read More »