Tag Archives: मराठा आंदोलन

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी …

Read More »

मराठा आंदोलनावर राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, सगळ्यांच उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे यांनी मांडली भूमिका

जवळपास वर्षभरापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेकवेळा आंदोलन केले. तसेच मागील काही वर्षी नवी मुंबईत मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशेष शासन निर्णय जारी करत त्याची …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, ही शेवटची लढाई मुख्यमंत्री फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. पोलिसांनी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शांततापूर्ण निदर्शने करण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला आणखी एक दिवस मुदतवाढ दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले …

Read More »

उद्धव ठाकरे मराठा आंदोलनावर म्हणाले, सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावून आश्वासन देणारे गावी जाऊन बसले का

मुंबई मराठी माणसांची राजधानी आहे. त्यामुळे मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही, तर काय गुजरात किंवा गुवाहाटीला जाणारा का? असा सवाल शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेणारे गावी जाऊन बसले असा टोला एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला. इंडिया आघाडीचे …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास मुदतवाढ आझाद मैदान पोलिसांकडून एक दिवसाची मुदत

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आंदोलनास सुरुवात केली. मात्र दुपारपर्यंत राज्य सरकारकडून चर्चेच्या निमंत्रणाशिवाय काहीच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर दुपार नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज आझाद मैदान पोलिसांकडे सादर केला. त्यावर आज दिवसभराची मुदत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? मुंबईतील आजच्या परिस्थितीस फडणवीस सरकारच जबाबदार; मराठा आंदोलकांना बदनाम करू नका

मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र …

Read More »

मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकार्याची भूमिका घेतलीय मंत्रिमंडळ उपसमिती घेणार निर्णय

गेल्या दहा वर्षांत आमच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला जितका न्याय मिळाला तो इतर कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात मिळाला नाही. मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले. मराठा समाजाचे आरक्षण टिकले. आता देखील आम्ही मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर त्या मार्फत विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

प्रविण दरेकर यांचा इशारा,… अहंकारच तुमचा वैचारिक ऱ्हास करेल मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर

मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातील अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यात एवढा अहंकार आलाय कि तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही, असे सणसणीत उपरोधिक टोला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले कि, मी भंगार आहे कि अंगार आहे हे …

Read More »

शरद पवार यांची टीका, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे विधान पोरकटपणाचे

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाचा मुद्दा हरकतीच्या मुद्याच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावरून विधानसभा सभागृहात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना पाह्यला मिळाला. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता …

Read More »

अशोक चव्हाण यांचा आरोप, जायकवाडीत पाणी सोडू नका… हा तर बदनामीचा डाव मराठवाडा विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पाठवलेले पत्रच ट्विट

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याची टीका काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर …

Read More »