Tag Archives: महाराष्ट्र

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकास मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची माहिती, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी महाराष्ट्र, बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग, शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार

उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी *महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.असे  उच्च व तंत्र शिक्षण …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या ग्रीनफिल्ड़ महामार्गाला मंजूरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने सहा पदरी, प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. ४,५००.६२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प जेएनपीए बंदर (पागोट) ते महाराष्ट्रातील चौक यांना जोडेल आणि बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) मोड अंतर्गत विकसित …

Read More »

आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालः उद्योग, सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट आर्थिक विकास दर ७. ३ टक्के राहण्याचा अंदाज

थेट  परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात  उद्योग आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची  पिछेहाट झाल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली.  उद्योग क्षेत्रात  ४.९ टक्के तर सेवा क्षेत्रात ७.८ टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे. २०२३- २४ या वर्षात उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे ७.६ …

Read More »

पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातसह या राज्यात कामाच्या बाबत कोणती गोष्ट समान ? कामगारांना किमान ७० तास करावे लागते, सुट्टीच्या दिवशीही काम

कामाच्या आठवड्याच्या इष्टतम लांबीभोवतीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताच्या कार्य संस्कृतीत बदल करण्याची गरज असल्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांनंतर अलीकडेच त्याला वेग आला. तरुण कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्यास तयार असले पाहिजे या मूर्ती यांच्या सूचनेमुळे उद्योगात वाद निर्माण झाला. नंतर, एल अँड …

Read More »

महाराष्ट्रात रोजगारासाठी येणारे स्थलांतरित मजूर सुरक्षित नाहीत राज्यातील रोजगाराबाबत स्थलांतरीत मजूरांनाच प्रश्न

नवीन कुमार राजेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी आहेत. दादरच्या भाजीपाल्याच्या बाजारपेठेत बटाटे-कांद्याचे बोरे वाहून नेण्याचे काम केले जाते. तो आपल्या गावी परतला. एक वर्ष नोकरी न मिळाल्याने तो मुंबईत परत आला आणि भारवाहक म्हणून काम करू लागला. दिवसभर घाम गाळून राहिल्यानंतर, त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात तो त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यात …

Read More »

अमित शाह यांचे आवाहन, महाराष्ट्राने नवीन फौजदारी कायदे सर्व आयुक्तालयांमध्ये लागू करावेत महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख पण मुंबई व महाराष्ट्राच्या… भाजपा सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आघाडी सरकार वाचवण्यासाठी केलेली धडपड

भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निती आयोगानेच सांगितलंय आर्थिक आणि सामाजिक स्थितीत घसरण निती आयोगाच्या अहवालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दिवाळखोरी होऊ नये, यासाठी अटलजींच्या सरकारने फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता. महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झाल्याचे निती आयोगाने सांगितलंय, हे अतिशय गंभीर आहे. निती आयोगाने दिलेल्या अहवालाची जबाबदारी राज्य सरकारच्या तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. सरकारने हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा, श्वेतपत्रिका काढून यावर …

Read More »

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची …

Read More »