Tag Archives: शिवसेना उबाठा

“संभाजी महाराज यांच्यासोबत तुलना?”, अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध भाजपा आमदाराने त्यांच्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलय -अनिल परब यांचा आरोप

राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाचा पहिलाच आठवडा आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवाल सादर करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्या काल विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत हरकत घेतली. तसेच संभाजी महाराज यांच्याशी अनिल परब यांनी स्वतःची तुलना केल्याचा …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, जलसंधारण विभाग मोहित कंबोज चालवतो…कोण आहे हा ? विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभाग मोहित कंबोज हा चालवत असल्याचा गंभीर आरोप करत हा कोण आहे मोहित कंबोज त्याला विचारल्याशिवाय विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर हे पाणीही पीत नाहीत असा गंभीर आरोप आज विधान परिषदेत केला. त्यामुळे विधान परिषदेत सरकारबाहेरील मात्र …

Read More »

शिवसेना उबाठाच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण, राजभाषा मराठीच भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकले नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे काही नाही असे मत एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यानंतर त्याचे राजकिय पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात उमटले. विधानसभेत शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी राज्य सराकरने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यावर बोलताना …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आव्हान, मराठी बाबत बोलणारा तो जर चिल्लर नसेल तर… गद्दारांनी छावा चित्रपटातून धडा घेऊन मराठीबाबतचे प्रेम दाखवून द्यावे

मुंबईत मराठी भाषा शिकण्याची गरज नसल्याची नसल्याचे वक्तव्य आरआरएसच्या नेते भैय्याजी जोशी कोण आहे त्याने मुंबईत येऊन केले. त्यांच्या वक्तव्यातुन मुंबईवर गुजराती भाषा थोपण्याचे भाजपाचे षडयंत्र दिसून येत आहे. तसेच ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हा चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर करत त्या दोघांवरील कारवाई …

Read More »

शिवसेना उबाठा आक्रमकः मुंबईत मराठी बोललीच पाहिजे आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्या त्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक बोली भाषा बोलल्या जातात. मात्र मुंबईत रहायचे तर मराठी भाषा आलीच पाहिजे असा कायदा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना करण्यात आला होता. मात्र आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नुकतेच मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही असे …

Read More »

पाण्यातील नायट्रेट पातळीत वाढः प्रश्नच समजेना, वाद मात्र गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरेंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवार यांच्या प्रश्नावरून मंत्री-अध्यक्ष संभ्रमात

राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यात नायट्रेट-नायट्रोझनचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार त्या पाण्याला फिल्टर करणार की नव्याने फिल्टर बसविणार असा सवाल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत यासंदर्भात जी पाच प्रश्न मी उपस्थित …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ते फोटो मुख्यमंत्री फडणवीसांकडे होते का? नेमका राजीनामा कशासाठी ?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरु होते. तसेच या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही केल्या होत नव्हता. अखेर संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो …

Read More »

विधान परिषदेत अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न- अंबादालन दानवे यांचा आरोप

विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी …

Read More »

अबू आझमी यांच्या त्या वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळः निलंबनाच्या मागणीवर सत्ताधारी ठाम गोंधळामुळे अखेर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकावरील आमदारांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या औरंगजेबबद्दलच्या वक्तव्यावरून एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणीवरून भाजपा दोन्ही शिवसेनेकडून एकच गोंधळ घालण्यात येऊ लागला. त्यामुळे विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी नंतर अर्ध्यातासासाठी …

Read More »

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस मागील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली नाही की मंत्री पदाचा राजीनामा घेतला नाही यावरून दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान …

Read More »