मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, तसेच संरक्षित कांदळवन (मॅग्रोव्ह) क्षेत्राला लागून असलेला भराव आणि कत्तल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी निष्कासन मोहीम राबवून २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवून सुमारे १०००० चौ.मी. एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »कॅनडा सरकारने बिष्णोई गँगला ठरवले दहशतवादी आंतरराष्ट्रीय स्तरावर खून, खंडणी, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थाच्या व्यापारात गुंतल्याने दहशतवादी म्हणून जाहीर
कन्झर्व्हेटिव्ह आणि एनडीपी राजकारण्यांच्या आवाहनानंतर सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी सोमवारी जाहीर केले की, भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खून, खंडणी, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कला कॅनडाच्या सरकारने अधिकृतपणे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. “बिश्नोई गँगने विशिष्ट समुदायांना दहशतवाद, हिंसाचार आणि धमकी …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी
नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …
Read More »केंद्र सरकारने निधी रोखल्याप्रकरणी तामीळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका एनईपी आणि पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणी करत नाही म्हणून हजारो कोटींचा निधी रोखला
तामिळनाडू राज्याने सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या विरोधात खटला दाखल केला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारवर समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ₹२००० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या महत्त्वाच्या शिक्षण निधीचा वार्षिक निधीचा वाटा रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ वकील पी. विल्सन यांनी प्रतिनिधित्व केलेल्या आणि अधिवक्ता रिचर्डसन विल्सन आणि अपूर्व मल्होत्रा यांनी तयार केलेल्या या …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, काँग्रेस मोर्चावर फडणवीस सरकारकडून दडपशाही खासदाराला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर गृहमंत्र्यांनी माफी मागावी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घाबरून मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजपाच्या तानाशाही कारभाराविरोधात मुंबईतील ईडी ED कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसकडून शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना फडणवीस सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. मला आणि …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रूड ऑईल ६५ डॉलरवर, पण भारतात जनतेची लूट युपीए सरकार असताना पेट्रोल २ रुपयांनी वाढले की ट्विट करणारे सेलिब्रिटी आता गप्प का?
जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी …
Read More »बांग्लादेशचे प्रमुख मुहम्मद युनूस यांचे गुंतवणूकीसाठी चीनला आमंत्रण भारताच्या चिंतेत बांग्लादेशच्या भूमिकेमुळे वाढ
बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी त्यांच्या चार दिवसांच्या चीन दौऱ्यादरम्यान बीजिंगला एक प्रस्ताव सादर केला ज्यामध्ये आश्चर्यकारकपणे भारताच्या सात ईशान्येकडील राज्यांचा समावेश होता. मुहम्मद युनूस यांनी सांगितले की, ही सात राज्ये भूपरिवेष्ठित आहेत आणि चीन बांग्लादेशचा वापर विस्तार करण्यासाठी करू शकतो. चीनच्या जवळच्या शेजारील भागात चीनचा वाढता प्रभाव …
Read More »निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती, सरकार आणि आरबीआय समन्वयाने काम करेल वाढीचा वेग लक्षात घेऊन समन्वयाने काम करणार
सरकारचे वित्तीय धोरण आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक उपायांचा एकत्रित परिणाम वापर आणि खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यास मदत करेल आणि त्याद्वारे आर्थिक विकासाला गती मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले. दिल्लीत मध्यवर्ती बँकेच्या बोर्डासोबत अर्थसंकल्पोत्तर बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना, निर्मला सीतारामन म्हणाल्या की उपभोग-चालित वाढ चक्राचे ट्रिगर …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर सरकारच भ्रष्ट राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा असतानाही तांत्रिक मांत्रिकाचे प्रकार होतात कसे?
महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya