Tag Archives: हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला

आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो मत’चा संदेश त्यांनी जनतेला दिला आहे. भाजपा …

Read More »

सचिन पायलट यांची टीका, देशहित गहाण ठेवून कोणताही व्यापार करार मान्य होऊ शकत नाही अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराने भारतातील अन्नदात्याचा गळा घोटला

व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामीकडे नेणारे करार कदापी स्वीकारार्ह नाहीत. व्यापार कराराच्या आडून देशहित आणि लोकहिताची आहुती देता येणार नाही. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार हा दबावाखाली केला असून तो भारतातील अन्नदात्यांचा गळा घोटणारा आहे, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास, भिवंडीचा महापौर सेक्युलर फ्रंट बनवणार सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट..

भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला, पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा व शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा इशारा, शेतकरी, बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते निर्धाराने लढले

काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार विकासाच्या नावावर केवळ राजकारण करत असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, आमहत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनतेचे हे प्रश्न हाती …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन, पंतप्रधान मोदी प्रचंड दबावात, सरकारचे अपयश व जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा भावना दुखावल्या गेल्याबद्दल शिवप्रेमींची दिलगीरी व्यक्त करतो: हर्षवर्धन सपकाळ

भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, जीभ कापायची असेल तर खुशाल कापा पण भाजपाला एक्सपोज करणे थांबणार नाही देशातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजपाची नौटंकी

अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून …

Read More »

भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राड्यात ९ जण जखमी काँग्रेसचे ३, भाजपा २,कार्यकर्त्ये जखमी आणि दोन पोलिस व दोन पत्रकार जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्‍याच्‍या काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाविरोधात पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले. रविवारी (१५ फेब्रुवारी २०२६) आंदोलनादरम्यान दगडफेकीचा आरोप विरोधी पक्षाने केला. सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, या हाणामारीत तीन काँग्रेस कार्यकर्ते, दोन भाजपा कार्यकर्ते, दोन पोलिस …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणुकीत भाजपाच्या पोस्टर्स, बॅनर्सवर टिपू सुलतानचा फोटो कसा चालतो? सावरकर व कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याबदद्ल भाजपा त्यांचे पुतळे कधी जाळणार?

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आन, बान, शान आहेत, त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही …

Read More »

पुण्यात टीपू सुलतानवरून काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्त्ये आमने-सामने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शने

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे नाव घेतले, तसेच शिवाजी महाराज हे जून्या काळातील आदर्श होते, अशी विधाने करत मुंबईच्या उभारणीत बिगर मराठी लोकांचे योगदान जास्त असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी राज्यातील भाजपाने भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेतली नाही. …

Read More »