राज्यातील अतिवृष्टीचे संकट आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. फेब्रुवारी -मार्च महिन्यात होऊ घातलेल्या बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री …
Read More »१२ वीच्या पेपरफुटीप्रश्नी अजित पवारांचा सवाल, सरकार काय झोपलंय का? शिक्षण मंत्री दिपक केसरकर गैरहजर अखेर महसूल मंत्री विखे-पाटील यांनी संध्याकाळपर्यंत निवेदन करण्याची दिली ग्वाही
नुकतेच १० वीचे पेपर संपून इयत्ता बारावीचे पेपर सुरु आहेत. कॉपीमुक्त राज्याचा संकल्प केला. मात्र त्या संकल्पनेचा पुरता फज्जा उडाला. त्यातच आज १२ वी चा गणिताचा पेपर सुरु होण्यापूर्वीच सकाळीच फुटल्याची घटना उघडकीस आली. याबाबतचे वृत्त पसरताच विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या विषयी मुद्दा उपस्थित करत म्हणाले, …
Read More »आता १२ वीच्या वेळापत्रकात बदल: दोन विषयांचे पेपर मार्चऐवजी एप्रिल महिन्यात इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील ०५ मार्च आणि ०७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे ०५ एप्रिल आणि ०७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री …
Read More »दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मिळणार सवलतीचे गुण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मागील दोन वर्षांपासून कोविड कारणामुळे एकाही विद्यार्थाला क्रिडा स्पर्धेत किंवा खेळाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे क्रिडा गुण मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गतवर्षी लेखी परिक्षा घेण्याऐवजी मुल्यांकन करत निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु यंदाच्यावर्षी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिक्षा …
Read More »अखेर १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच: मात्र विद्यार्थ्यांना या गोष्टींची सवलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या, रद्द करा या मागण्यांवरून दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईसह, उस्मानाबाद, नागपूर सह अनेक जिल्ह्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परिक्षा पुढे ढकलणार का? ऑनलाईन घेणार का? याबाबत उत्सकुता निर्माण झाली होती. मात्र परिक्षा नियोजित वेळेत आणि …
Read More »१० वी- १२ वी परिक्षेच्या एक दिवस आधी पर्यंत परिक्षा अर्ज भरा विलंब शुल्क भरण्याची गरज नाहीः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम कोरोना संसर्गजन्य आजार आणि ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे राज्यातील एकही विद्यार्थी १० वी १२ वीच्या परिक्षेपासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून या दोन्ही परिक्षांच्या एक दिवस आधीपर्यंत परिक्षेचा अर्ज कोणत्याही विलंब शुल्काशिवाय भरून घेण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळास देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकही …
Read More »१० वी, १२ वीच्या परिक्षा होणार ऐन उन्हाळ्यात तारीख निश्चित नसली तरी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वी परिक्षा आता घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून १० वी च्या परिक्षा मे नंतर तर १२ वी परिक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोना लॉकडाऊनमुळे शैक्षणिक कामकाज म्हणावे तसे सुरु झाले नाही. त्यातच ऑनलाईन पध्दतीने …
Read More »
Marathi e-Batmya