१० वी, १२ वीच्या परिक्षा होणार ऐन उन्हाळ्यात तारीख निश्चित नसली तरी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील १० वी आणि १२ वी परिक्षा आता घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून १० वी च्या परिक्षा मे नंतर तर १२ वी परिक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
कोरोना लॉकडाऊनमुळे शैक्षणिक कामकाज म्हणावे तसे सुरु झाले नाही. त्यातच ऑनलाईन पध्दतीने क्लासेस सुरु होण्यासही बराच उशीर झाल्याने सर्वच विषयांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नियोजित फेब्रुवारी, मार्च महिन्यात नियमित होणाऱ्या परिक्षा १० वी, १२ वी परिक्षा यावर्षी होणार नाहीत.
त्यामुळे यंदा इयत्ता १२ वी ची परीक्षा १५ एप्रिलनंतर आणि इयत्ता १० वी ची परीक्षा ही येत्या १ मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत. त्याचबरोबर आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत असून याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

रविंद्र चव्हाण यांचा इशारा, भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई भाजपामधून फुटून सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणा-या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *