Tag Archives: ajit pawar

९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …

Read More »

कोविड विरोधी लढ्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, …

Read More »

रूग्ण सापडल्यानंतर मंत्रालय आणि प्रशासकिय इमारत दोन दिवसांसाठी बंद निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लागण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना होवू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला अखेर मंत्रालयातच या विषाणूची लागण झालेले रूग्ण सोमवारी सापडले. त्या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांनाही होवू नये यासाठी मंत्रालय, नवीन प्रशासकिय इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २९ आणि ३० एप्रिल या दोन …

Read More »

आपला फोकस कोरोनाच्या लढाईवर…त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल खासदार सुप्रिया सुळे यांचे विरोधकांवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी कुठल्याही राजकीय विषयाबद्दल कुठलीही आता अस्थिरता आणणं हे अशा काळात योग्य नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करुन लढली पाहिजे. दरम्यान आपला फोकस कामावर असला पाहिजे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपला फोकस कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी असायला हवा. ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या …

Read More »

बँकानो, शेतकरी थकबाकीदार नाही कर्ज द्या केंद्रामार्फत आरबीआयला विनंती करण्याचा राज्य मंत्रिमंडळात निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानू नये. तसेच त्यांना खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज द्यावे अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय झाला. कोविडमुळे …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी मंत्रिमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यावर कोरोनाचे संकट असताना साधारणत: १० दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्य मंत्रिमंडळाने प्रस्ताव पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सध्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर नियुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर अद्याप निर्णय न घेण्यात आल्याने राज्यपालांना मंत्रिमंडळाच्यावतीने पुन्हा एकदा विनंती करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल

मुंबई: प्रतिनिधी पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अनिल कवडे,सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर यांचा समावेश आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि …

Read More »

शरद पवार म्हणाले पंतप्रधानांना राज्यासाठीही पॅकेज द्या अन्यथा… राज्याला एक लाख कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आवाहन

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा ३ लाख ४७ हजार कोटी रूपयांचा आहे. मात्र लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत १ लाख ४० हजार कोटी रूपयांची महसूली तूट येणार असल्याने …

Read More »

साहित्यिक, सामाजिकक्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या “झुलवा” काराचे निधन मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाहिली श्रध्दांजली

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या साहित्यिक क्षेत्रात दलित साहित्यातील नामवंतानंतर देवदासी प्रथेतील जुलमी धार्मिक रूढीच्या विरोधात आवाज उठविणारे प्रसिध्द झुलवा पुस्तकाचे लेखक उत्तम बंडू तुपे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या कांदबरीने आणि त्यावरील नाटकाने साहित्य, नाट्यक्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गेले …

Read More »

कोणत्याही विभागातला कर्मचारी मृत पावल्यास ५० लाख लवकरच योग्य तो निर्णय होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असून याकामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत याबाबत योग्य तो निर्णय होईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. कोरोना लॉकडाऊनकाळात रोगजाराच्या …

Read More »