मुंबई: प्रतिनिधी काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला असून अशा व्यक्तींवर …
Read More »केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर राज्य सरकारकडून गुन्हे अमेरिका, रशियासह १८ देशाच्या परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल: गृहमंत्री देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचे संकट देशावर घोंघावत असतानाही तब्लीगीसाठी परदेशी नागरिकांना खास हजेरी लावता यावी यासाठी केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर अखेर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे या सर्व परदेशी नागरिकांवर व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून यात अमेरिका, रशिया, इराण यासह १८ देशातील नागरिकांचा …
Read More »अधिकारी अमिताभ गुप्तांच्या निलंबनाचे अधिकार राज्य सरकारलाही ? अनिल गलगली यांनी सरकारला पाठविली नियमावली
मुंबई: प्रतिनिधी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या वाधवान बिल्डरवर मेहेरनजर दाखवित पत्र देणारे राज्याच्या गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांस निलंबित करण्याचा अधिकार केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारलाही असल्याची माहिती पुढे असून यासंदर्भातील नियमावलींची पुस्तिका-माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविण्यात आल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्त्ये अनिल गलगली यांनी …
Read More »खोट्या बातम्या आणि अफवा प्रकरणी २४ तासात २० जणांवर सायबर गुन्हे राज्याचे सायबर अधिक्षक बालासिंग राजपूत यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आपतकालीन कायदा लागू केलेल्या असतानाही काहीजणांकडून कोरोना आजाराच्या अनुषंगाने खोट्या बातम्या, अफवा आणि एखाद्या समाजाविषयी तिरस्कार युक्त प्रक्षोभक साहित्य प्रसारीत केल्याप्रकरणी मागील २४ तासात २० जणांच्या विरोधात सायबर कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागाचे अधिक्षक बालासिंग राजपूत यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी …
Read More »रात्री २ वाजता मरकजमध्ये राष्ट्रीय सल्लागार अजित डोवल काय करत होते? राज्याचे गृहमंत्री देशमुख यांचा केंद्रीय गृहमंत्री शाह यांना सवाल
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचे संकट घोंघावत असताना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे झालेल्या निझामुद्दीन मरकजमधील तब्लीगीच्या आयोजनाला परवानगी का देण्यात आली ? असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित करत याच मरकजमध्ये रात्री २ वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तब्लीगीचे पुढारी मौलाना हे कोणती …
Read More »कम्युनिटी किचनसाठी तुरूंगातील कैद्यांनी पिकविलेला भाजीपाला अकोला कारागृहातील प्रशासनाकडून कैद्यांच्या मदतीने पुढाकार
अकोला: प्रतिनिधी कोरोना या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. या संचार बंदी काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्या साऱ्यांना अन्न देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरु आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे. या व अशा विविध घटकांची सांगड घालून जिल्हा प्रशासनाने …
Read More »‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला …
Read More »परिस्थिती पाहूनच १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करा मुख्यमंत्र्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानांची सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्व राज्यांनी लॉकडाऊन केले. तर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल २०२० रोजी संपत असली तरी त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन एकदम न उठवता ती टप्याटप्याने शिथिल करावी अशी सूचना करत राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे …
Read More »पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …
Read More »फक्त मालवाहू ट्रक चालणार खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून न अडविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya