मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपल्या …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंसाठी काँग्रेसची माघार: मात्र राष्ट्रवादीसमोर लीन ९ वा उमेदवार मागे
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडूण येण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणूकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधान परिषदेची जास्तीची एक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु राष्ट्रवादीने त्यांच्या हिश्यातील दुसरी …
Read More »अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …
Read More »कोविड फायदा: एसटी प्रवाशांना मिळणार ही सवलत परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ” स्मार्ट कार्ड ” योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के ते १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित …
Read More »सर्व आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात: आर्थिक तोडग्यासाठी दोन समित्या विशेष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास अपयश येत असल्याने अखेर या आजाराशी लढा देण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही कपात एक वर्षासाठी करण्याचा …
Read More »उध्दव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याचा अजित पवारांचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रस्ताव पाठविण्यावर शिक्कामोर्तब
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधान परिषद किंवा विधानसभेवर निवडूण येणे आवश्यक आहे. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वच निवडणूका निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राजकिय संकेतानुसार स्वत: मुख्यमंत्री …
Read More »कोरोनाला न घाबरता मंत्र्यांनी लावली हजेरी मंत्रिपरिषदेला मंत्रालय, जिल्ह्यातून मंत्र्याची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतच असताना या आजाराच आगामी काळात पराभूत करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी व्हिडीओ काँन्फरसिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे यातील अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातून बैठकीला हजेरी लावली. मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव …
Read More »राष्ट्रवादी- शिवसेना म्हणाली, दूषित वातावरण होतेय भाजपाने बोलू नये एनपीआर, सीएएच्या कायद्यावरून विधानसभेत रणकंदन
मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनपीआर आणि सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात असल्याने याप्रश्नी गृह विभागाने लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना बोलू न …
Read More »छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली विमानतळाला संभाजी महाराजांचे तर मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव
मुंबईः विशेष प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय १९९३ साली युती सरकारने घेतला होता. त्यानंतर आता शिवसेना सत्तेच्या प्रमुखस्थानी असतानाही शहराचे नामांतर संभाजीनगर न करता केवळ औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमाताने पारीत झाल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या …
Read More »करोना आजारामुळे अधिवेशनाचा शनिवारी शेवटचा दिवस सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांची विधानसभेत माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विशेषतः मुंबई, पुणे आदी भागात करोना व्हायरसने प्रभावित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तसेच या आजाराची लागण विधिमंडळाच्या सदस्यांना होवू नये याकरीता विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या शनिवारी संपविण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी …
Read More »
Marathi e-Batmya