Tag Archives: budget session at mumbai

टीम जुनीच पण अजित पवार यांची खुर्ची…एकनाथ शिंदे यांचा टोला, तर अजित पवार म्हणाले…. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत संवाद

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार अशी टीका करत बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आवर्जून उपस्थित राहिले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, शेतकरी विरोधी, विसंवादी सरकार म्हणून चहापानावर बहिष्कार मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक

सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, अंतरीम अर्थसंकल्पातून कंत्राटदारांना पोसण्याचं काम

पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पात कंत्राटदारांना पोसण्याचं काम या सरकारने केलं आहे. जनतेच्या हाती केवळ भोपळा देण्याचं काम सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर विविध विषयांवर जोरदार हल्ला चढविला. अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते. अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने आणलेला सहकार विधेयक हे …

Read More »

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राकडे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन केले असून राज्याच्या महसुली उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आर्थिक शिस्त पाळताना अनावश्यक खर्च टाळण्यात येत आहे. अशा उपाययोजना आणि कृती कार्यक्रमाच्या …

Read More »

‘अर्थसंकल्पात घोषणाचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ’

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला.राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत ‘अर्थसंकल्पात घोषणांचा …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

दाओस येथील आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शनामध्ये मागील वर्षी सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विविध आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी केलेल्या एक लाख ३७ हजार कोटी रुपये इतक्या करारांपैकी ७३ टक्के प्रकल्पांची आत्तापर्यंत राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे. गेले १६ महिने महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत देशात क्रमांकावर असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर अजित पवार स्पष्टोक्ती, सोडणार नाही कोणाला

नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्याखोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर याप्रकरणी मरिन लाईन्स पोलिस स्थानकात मुख्यमंत्री सचिवालयाने गुन्हाही दाखल केला. याप्रश्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना होतात हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी …

Read More »

विधानसभेत चर्चा मुंबईवरची मात्र वाद नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरून

मुंबईतील पायाभूत सुविधांबरोबर मोकळ्या भूखंडाप्रकरणी आणि परवडणाऱ्या दरातील घरांचा प्रश्नी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि त्याच्या जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांना दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्याच्या उद्घाटनाला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सूचक इशारा, आई-बहिण काढता अन् शिवाजी महाराजांचे उदाहरण देता

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी हा प्रश्न रखडण्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप करत आपला बळी घेण्यासाठी इन्कांऊटर करण्याचा किंवा सलाईनमधून विष देण्याचा डाव असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण रहात असलेला …

Read More »

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे १५ महत्वाचे निर्णय आदिवासीसह शेतकरी आणि शहरीभागातील नागरिकांना खुष करण्याचा प्रयत्न

राज्यातील विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशना निमित्त राज्य सरकारकडून राज्यातील जनतेसाठी खास राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेस, मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आदिवासी समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही निर्णय घेतले. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले …

Read More »