मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांबरोबर महानगरातील ६५ लाख लोकांसाठी जीवन वाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वे लोकलने नव वर्षानिमित्त अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी किमान एक मिनिट लोकल गाड्यांचे हॉर्न सीएसएमटी स्थानकात हॉर्न वाजविण्यात आला. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता १ जानेवारी २०२१ ची सुरूवात होताच सीएसएमटी स्थानकात असलेल्या सर्व …
Read More »लोकल सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर रेल्वेने दिले हे उत्तर सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबतच्या योजनेवर काम सुरु
मुंबई : प्रतिनिधी शहर आणि उपनगरात लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याच्या अनुषंगाने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीकोनातून राज्य सरकारने पाठविलेल्या पत्रावर आम्ही करत असल्याची माहिती मध्य रेल्वेने एका ट्विटच्या माध्यमातून ट्विटरवर दिले. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यात प्रवाशांमध्ये शाररीक अंतर पाळले जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून योजना करणे आवश्यक …
Read More »मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर सेवा सुरू करावी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सूचना
मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू …
Read More »चाकरमानी महिलांसाठी खुषखबर ! उद्यापासून लोकलने प्रवास करता येणार परंतु ठराविक कालावधीतच, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी
मुंबई: प्रतिनिधी मागील सात महिन्यापासून राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच मुंबई उपनगरात लोकलने प्रवास करता येत होता. मात्र आता या परवानगी असलेल्यांबरोबरच सर्वसाधारण महिला चाकरमानींनाही उद्यापासून अर्थात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून लोकलने प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी त्या कालावधीतच प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सकाळी ११ वाजल्यापासून …
Read More »खुषखबर : उद्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे बुकिंग आणि प्रवास सुरु राज्य सरकारच्या missionbeginagain च्या मार्गदर्शक तत्वानंतर रेल्वेची माहिती
मुंबई: प्रतिनिधी नुकतेच राज्य सरकारने राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी असलेली ई-पासची अट काढून टाकल्यानंतर महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी रेल्वेनेही परवानगी देत उद्यापासून बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे अनेकजणांना कामानिमित्त बाहेरगावी आणि इतर ठिकाणी जाता येत नव्हते. मात्र रेल्वेच्या निर्णयामुळे आता राज्यातल्या …
Read More »कोरोना इम्पॅक्टः पुणे आणि मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या २३ गाड्या बंद मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईहून पुणेला जाणाऱ्या आणि पुणेहून पुढे लांब जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस, मेल गाड्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईला येणाऱ्या २३ गाड्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. या सर्व गाड्या १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत …
Read More »मध्य- हार्बर रेल्वे सेवा ठप्प सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची रेल्वे प्रशासनाकडून माहिती
मुंबईः प्रतिनिधी मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला असून कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले …
Read More »मध्य रेल्वेने ३.३७ कोटी खर्च तर केले पण अहवाल महत्वाचा एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षेवरील खर्चावरील अहवालाची प्रतिक्षा
मुंबईः प्रतिनिधी मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असून यावर्षीही आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या ऑडिटनंतर सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वे प्रशासनाने एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर रुपये ३.३७ कोटी खर्च केले. आरटीआय कार्यकर्ते …
Read More »बुलेट ट्रेन रद्द करून त्याचा निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन
ठाणेः प्रतिनिधी दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे प्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरुन रेल्वेत चढलो तरी जीवंत परत येऊ का? अशी धाकधूक प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पुल आणि रस्त्यांवरील पुल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारत नाही. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी …
Read More »१५ डब्याची लोकल आता डोंबवलीकरांनाही मिळाली डोंबिवली ते सीएसटीएम दोनवेळा तर कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या फेऱ्या वाढविल्या
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटीएम ते कल्याण १५ डब्याच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करत डोंबिवलीकर प्रवाशांच्या सेवेसाठी आजपासून १५ डब्यांच्या लोकल दाखल होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली या मार्गावर १५ डब्यांच्या स्वतंत्र दोन लोकल फेऱ्या सुरू होत आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या दुसरा …
Read More »
Marathi e-Batmya