खुषखबर : उद्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे बुकिंग आणि प्रवास सुरु राज्य सरकारच्या missionbeginagain च्या मार्गदर्शक तत्वानंतर रेल्वेची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

नुकतेच राज्य सरकारने राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी असलेली ई-पासची अट काढून टाकल्यानंतर महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी रेल्वेनेही परवानगी देत उद्यापासून बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे अनेकजणांना कामानिमित्त बाहेरगावी आणि इतर ठिकाणी जाता येत नव्हते. मात्र रेल्वेच्या निर्णयामुळे आता राज्यातल्या राज्यात आणि राज्यांतर्गंत प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने काल प्रसिध्दी पत्रक जारी करत राज्यातल्या राज्यात प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले. तसेच यासंदर्भातील बुकिंगही करता येणार असून प्रवासासाठीची बुकिंग उद्यापासून करता येणार असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, गडचिरोलीला जाता येणार आहे. तर त्या भागातून मुंबईला येता येणार आहे.

 

About Editor

Check Also

राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, त्यांना आंब्यावर बोलायला वेळ होता सीबीएसईच्या उत्तर पत्रिकांच्या स्कॅनिंगच्या घोळामुळे गोंधळ

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इयत्ता १२वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीसाठीच्या बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *