मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. भाजपा सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते पण कोणताच प्रकल्प पुर्ण करत नाही व जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. एक महामार्ग बनवण्यास एवढी वर्षे लावून सरकार कंत्राटदारांचे खिसे भरत आहेत का? असा सवाल काँग्रेस खासदार …
Read More »केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पलटवार, राहुल गांधी यांचे आरोप निराधार अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित आहे. राहुल गांधी हे सातत्याने खोटे, निराधार आरोप करत असतात. या कराराबाबतही ते फेक नरेटिव्ह पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी केली. दिल्लीत एका कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते. पियुष गोयल पुढे बोलताना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा महायुती सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सिल केल्याची घटना अत्यंत गंभीर
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना उबाठाला पाठिंबा चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही
चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा) ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज १६% ने महाग होणार महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची लूट
राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ५ वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी केले जातील व पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात केली जाईल असे सांगितले होते पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. वीजदर कमी होणार नसून ते १६ टक्क्यांनी महाग होणार आहेत, असा …
Read More »राहुल गांधी यांच्या आरोपानंतर हरदीप सिंग पुरी यांचा खुलासा, होय मी एपस्टाईनला भेटलो पण आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी राहुल गांधी यांनी कुप्रसिद्ध एपस्टाईन फाइल्सशी त्यांचा संबंध जोडल्याच्या आरोपांना खोडून काढले आणि आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या (आयपीआय) शिष्टमंडळाचा भाग म्हणून लैंगिक गुन्हेगाराला भेटल्याचा खुलासा केला. राहुल गांधींच्या स्फोटक लोकसभेतील भाषणानंतर पत्रकार परिषद घेत मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिले. हरदीप सिंग पुरी …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, लाज वाटली पाहिजे, भारत विकला अर्थसंकल्पावरील भाषणा दरम्यान संसदेत पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका-भारत व्यापार करारावरून साधला निशाणा
लोकसभेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर अमेरिकेसोबतच्या नुकत्याच झालेल्या व्यापार करारावरून हल्ला चढवला आणि सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे म्हटले. त्यावर तीव्र हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले की, केंद्राने “भारत विकला”, तसेच अमेरिकन वस्तूंना प्रवेश देऊन सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शिवसेना (उबाठा) च्या भुमिकेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का? चंद्रपूर महापौर निवडणुकीबाबत निरीक्षकाकडून अहवाल मागवणार
चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक …
Read More »दिल्ली पोलिसांकडून लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या प्रसाराविरोधात विरोधात गुन्हा दाखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अद्याप मंजूरी दिली नाही
माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी लिहिलेल्या अप्रकाशित पुस्तकाच्या सोशल मीडियावर झालेल्या कथित प्रसाराबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे एका अधिकृत निवेदनात सोमवारी सांगण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे एक अप्रकाशित पुस्तक मिळाले होते, जे संरक्षण मंत्रालयाकडून (MoD) मंजुरीशिवाय प्रसिद्धीसाठी पाठवायचे नव्हते आणि …
Read More »जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही मतदारांनी जिल्ह्याची ओळख अबाधित ठेवली
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम …
Read More »
Marathi e-Batmya