आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …संविधान वाचवणे भाजपा, फडणवीसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? राहुल गांधींच्या पहिल्याच सभेने भाजपा घाबरली, भाजपाच्या शक्ती स्थळाजवळच कार्यक्रम घेतल्याने जळफळाट
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, …हिंमत नसल्याने आरएसएसचा संविधानावर लपून हल्ला जातनिहाय जनगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली, काहीही झाले तरी जातनिहाय जनगणना होणार व आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा …
Read More »अतुल लोंढे यांची टीका,… हे भाजपाचे फेक नॅरेटीव्ह संविधान सन्मान संमेलनाचे लाईव्ह फीड काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून मिळणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरमध्ये उद्या बुधवार ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला प्रसार माध्यमांना बंदी घातली आहे, ही भारतीय जनता पक्षाने पसरवलेली अफवा आहे. संघाच्या शिकवणीप्रमाणे व नेहमी खोटे बोलण्याच्या सवयीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलले आहेत. संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमाचे LIVE …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे भाकित, मविआच्य़ा विजयाने केंद्रात बदल घडेल सामाजिक न्याय खात्याला मंत्रीच नाही, आरक्षण संपविण्याचा डाव
मागास प्रवर्गाच्या सामाजिक उत्थानाच्या योजना बंद होत आहेत. ओबीसी एसटीएससी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद करणे. हा या सरकारचा एजेंडा असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा केंद्रातील सत्ता बदल ठरेल दोन महिन्यात त्याचे परिणाम दिसतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. राज्यातील महाविकास आघाडी …
Read More »प्रकाश जावडेकर यांचे आवाहन, काँग्रेसच्या खटाखट गॅरंटीला भुलू नका काँग्रेस खोटी आश्वासने देणारा पक्ष
निवडणूक आली की खटाखट खोटी आश्वासने देण्याची काँग्रेसला सवयच आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली कोणतीच आश्वासने त्यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये पाळली नसल्याने महाविनाश आघाडीवर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील मतदारांना केले आहे. भाजपा मीडिया सेंटर येथे …
Read More »नाना पटोले यांची प्रतिक्रिया, धन्यवाद, पण रश्मी शुक्लांना हटविण्यात वेळ का लागला? निवडणुकीसंदर्भातील कोणतेही काम रश्मी शुक्ला यांना देऊ नका
वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना …
Read More »काँग्रेस-मविआला धक्का कोल्हापूर उ. मधून मधुरिमा राजे घाटगे यांचा अचानक अर्ज मागे खासदार शाहु महाराज यांची माहिती
विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र कोल्हापूर उत्तर मधून खासदार शाहु महाराज घाटगे यांच्या स्नुषा तथा मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमा घाटगे यांनी आज अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठांना नेत्यांना याची कल्पना दिली …
Read More »निवडणूकीपूर्वी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय रश्मी शुक्ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आदेश
राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही दोन वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थात भाजपाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रश्मी शुक्ला यांची पोलिस महाचसंचालक पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी सातत्याने काँग्रेसने दोन वेळा राज्याचे निवडणूक मुख्याधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, जिथे भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांची अधोगती राज्यातील गुजरातधार्जिणे व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळेच महाराष्ट्राची अधोगती
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची …
Read More »
Marathi e-Batmya