धनगर समजासह राज्यातील सर्व उपेक्षित, वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळया योजना उपेक्षित, वंचित वर्गापर्यंत पोहचवून दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणू , असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. धनगर समाजासाठी …
Read More »शिंदे-फडणवीसांच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख करणार विधिमंडळात उपोषण ठाकरे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण
सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून या अधिवेशात ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांवर घालण्यात स्थगिती उठविण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु आहे. मात्र ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी या चर्चेच्या अनुषंगाने मोठे विधान केल्याने भाजपा आणि शिंदे गटाकडून वापरण्यात …
Read More »जुन्या पेन्शनबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा आश्वासन, कर्मचारी, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर… जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, …
Read More »देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक विधान परिषदेत बोलताना ६ हजार ५०० इतके मानधन करणार असल्याचे केले स्पष्ट
ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला …
Read More »अजित पवारांचे आव्हान, किमान फडणवीसांनी घोषणा केल्याप्रमाणे तरी करावं… रोज आठ शेतकरी संपवतात जीवन- शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन
राज्यातील कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, असे आश्वासन सरकार सभागृहात देत असले तरी फिल्डवर प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडण्याचे काम सुरु आहे. खरं तर सरकारने कृषी धोरणानुसार वीज थकबाकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ करायला हवी. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हीच मागणी करत असत, मग …
Read More »शिंदे-फडणवीसांच्या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ मविआकडून “भ्रमाचा भोपळा” आंदोलन बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणला
बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित …
Read More »अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची खोचक टीका, गरजेल तो बरसेल काय यापेक्षा महाविकास आघाडीने मांडलेला अर्थसंकल्प चांगला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर खोचक टीका करत गरजेल तो बरसेल काय अशी टीका करत महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीचे दोन-तीन अर्थसंकल्प मांडले होते ते अभ्यासपूर्ण होते. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर का हलवा आहे …
Read More »जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला, पुन्हा अर्थसंकल्प मांडायचा नाही, हा एकमेवच… जे शक्य नाही अशा गोष्टींची कमिटमेंट या सरकारने राज्यातील जनतेला करून घोषणांचा पाऊस पाडला...
आजचा अर्थसंकल्प १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थमंत्र्यांनी मांडला परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटीच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट १६ हजार कोटीवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे दर्शन झाले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …
Read More »महिला, विद्यार्थी, शिक्षणसेवक, आशा सेविकांसह या घटकांना अर्थसंकल्पातून मोठी खुषखबर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचे संकेत देत यापूर्वीच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याची पूर्तता आज अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी केल्याचेही दिसून आले. मागील अनेक वर्षापासून आशा सेविका, शिक्षणसेवक, शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या मानधन व शिष्यवृत्तीत मोठी वाढ केली. तसेच जन्माला आलेल्या मुलीसाठी बेटी बचाव अर्थात लेक लाडकीच्या सरकारी अनुदानात वाढ …
Read More »आरोग्यमंत्री डॉ.सावंतांच्या त्या घोषणेमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प फुटला? घोषणा करण्याच्या नादात फडणवीसांनी केले सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात या अनुषंगाने जवळपास सर्वच राजकिय पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिंदे-फडणवीस सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. मात्र साधारणतः अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्यातील एखादी घोषणा जर बाहेर आली तर अर्थसंकल्प आधीच …
Read More »
Marathi e-Batmya