मागील काही दिवसांपासून थोडंस विजनवासात गेलेल्या आणि पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करत उपस्थित लाखो लोकांच्या समुदायाच्या उपस्थित मी आतापर्यंत तुमची मान शरमेने खाली जाईल अशी गोष्ट केली का असा सवाल जनसमुदायाला विचारत असे काम मी कधीही केले नाही. मागील निवडणूकीत हरले. निवडणूकीत जय …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओबीसी जनगणनेला विरोध नाही… ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही
ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी जनगणनेच्या …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकार करतेय तरी काय? सरकार फक्त खोक्यात व्यस्त
राज्यातील अनेक घटक सध्या आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच, महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हानं राज्यासमोर …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका;निकषांचे सावट दूर करा राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा
राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून राज्यावरील दुष्काळाचे, निकषांचे …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ? आरक्षणप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करुन मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी
राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. सरकारमधील मंत्री बोलतात एक तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देत आहेत, ही गोंधळाची परिस्थिती …
Read More »ट्विट करत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, राजकारणापायी…. निधी वाटपावरून साधला निशाणा
राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटानेही भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अजित पवार हे सत्तेत सहभागीही झाले. मात्र अजित पवार हे जरी राज्याचे गृहमंत्री असले तरी त्यांना पूर्ण अधिकार अद्यापही दिले नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. याच मुद्यावरून शरद पवार समर्थक रोहित पाटील यांनी …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या मंत्र्यांनी निर्णय घेतला त्यांच्याच बरोबर सत्ता उपभोगायची… राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर झेपत नसेल तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगावं
भारतीय जनता पक्षाबद्दल हसावं आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्न बद्दल काय बोलावं हा प्रश्न मला पडला आहे. माझी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहतच असाल. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी …
Read More »नाना पटोले यांचा टोला,…एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगा शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर घालवण्याचे पाप भाजपाचेच
देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, तसेच या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »विजय वडेट्टीवार यांनी केला सरकारच्या या वृत्तीचा निषेध मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाबाबत सरकारचा जाणीवपूर्वक भेदभाव
राज्यातील टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये तसेच योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी व धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. परंतु सरकारने भेदभाव करत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला जाणीवपूर्वक यातून वंचित ठेवले आहे. सरकारच्या या वृत्तीचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला …
Read More »अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर, काँग्रेस आघाडीने कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर
काँग्रेस आघाडी सरकारने कधीही कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही, आता मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अशा पदांवर सुद्धा कंत्राटी भरतीचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करतेय असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. तसेच अशोक …
Read More »
Marathi e-Batmya